मोगरे गावचे सुपुत्र पत्रकार सामाजिक कार्यकर्ते संदीप रामचंद्र शेमणकर यांना “कोकण रत्न” मानद पदवी प्रदान
मुंबई – संदीप शेमणकर
राजापूर तालुक्यातील आडीवरे परिसरातील मोगरे गावचे सुपुत्र
पत्रकार,दैनिक रायगड स्वाभिमान मराठी वृतपत्राचे पालघर जिल्हा संपादक, रुग्ण सेवक, सामाजिक कार्यकर्ते संदीप रामचंद्र शेमणकर यांच्या कार्याची दाखल घेत.
स्वतंत्र कोकण राज्य अभियान या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष संजयजी कोकरे यांच्या हस्ते संदीप रामचंद्र शेमणकर यांना
“कोकण रत्न” मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे प्रदान करण्यात आलेल्या “कोकणरत्न” या प्रतिष्ठित पदवीसाठी यंदा कोकणातील समाजसेवा, शिक्षण, साहित्य, कला, पत्रकारिता, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, युवक मार्गदर्शन व जनकल्याण या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थांची निवड करण्यात आली होती. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक प्रबोधनासाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला होता.
पत्रकार संदीप रामचंद्र शेमणकर यांनी केलेले समाज कार्य,आणि कोकणातील आरोग्य क्षेत्रात यामधील उल्लेखनीय कार्य, विविध संस्थांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेना केलेले शैक्षणिक साहित्य कार्य, पत्रकारित्या आपल्या लेखणीतून आवाज उठवत रस्ते, एसटी डेपो, सार्वजनिक शौचालय, पुल, यांच्या कामाचा पाठ पुरावा करत. उल्लेखनीय केलेले कार्य,
हा भव्य व शानदार “कोकणरत्न पदवी” प्रदान सोहळा शनिवार, दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत, मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदानाजवळ, मुंबई येथे संपन्न झाला. कार्यक्रम स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला, व कोकणरत्न पदवीचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार व संपादक सचिन कळझुनकर सर यांची उपस्थिती लाभली.या वेळी मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर, खजिनदार राजेंद्र सुर्वे, नेते सुभाष राणे तसेच मुख्य सल्लागार दिलीप लाड, मोगरे गावातील युवा कार्यकर्ते प्रकाश चव्हाण, सुनील साखरकर, संतोष तिर्लोटकर, प्रकाश सातोपे व तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत व मान्यवर मंडळी उपस्थित होती.
यावेळी पत्रकार संदीप शेमणकर यांनी पुरस्काराचे संपूर्ण श्रेय मोगरे गावातील त्यांचे सहकारी यांना दिले. तसेच सर्व हितचिंतकांचे व आयोजकांचे आभार देखील व्यक्त केले.
पुरस्कार प्रदान झाल्या बद्दल तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.















