कोकणच्या हापूसवर युद्धाचे सावट; आखाती देशांतील तणावामुळे आंबा निर्यातीला मोठा फटका बसण्याची भीती उत्पादनात ८० टक्क्यांची घट आणि आंतरराष्ट्रीय संघर्षाचा दुहेरी फटका; बागायतदार चिंतेत मुंबई: मध्यपूर्वेतील इस्रायल-इराण संघर्षाचा धग आता थेट कोकणच्या लाल मातीपर्यंत पोहोचली आहे. आखाती प्रदेशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे महाराष्ट्राच्या कृषी निर्यातीवर, विशेषतः जगप्रसिद्ध हापूस आंब्यावर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. १५ मार्चपूर्वी परिस्थिती निवळली नाही, तर आंबा उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, अशी भीती महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकाळ यांनी व्यक्त केली आहे. निर्यात हंगामावर टांगती तलवार कोकणातून दरवर्षी १५ ते २० मार्च दरम्यान आंबा निर्यातीचा हंगाम खऱ्या अर्थाने सुरू होतो. मात्र, इराणच्या युद्धात सहभागामुळे विमान वाहतूक आणि लॉजिस्टिक सेवांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. निर्यातीतील वाटा: भारताच्या एकूण आंबा निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा ६० ते ७० टक्के आहे. कोकणाचे योगदान: रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड