सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी द्वारे दि. ८ जून २०२६ रोजी ‘जागतिक महासागर दिन’ निमित्त पांढरा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता आणि जनजागृती मोहीम संपन्न रत्नागिरी – मानवी जीवनातील आणि हवामान संतुलनातील समुद्राचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, ८ जून २०२६ रोजी ‘जागतिक महासागर दिना’ निमित्त (वर्ड ओशन डे) रत्नागिरीत विशेष जनजागृती व किनारपट्टी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी संयुक्त राष्ट्रातर्फे (UN) जागतिक महासागर दिनासाठी ‘Reimagine: Beyond the world we know, a new relationship with our ocean’ (पुनर्विचार: आपल्या परिचित जगाच्या पलीकडे जात महासागराशी एक नवीन नाते निर्माण करूया) ही मुख्य संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. केवळ समुद्राकडून संसाधने मिळवणे एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता, मानवाने समुद्राचा खरा रक्षक बनले पाहिजे आणि समुद्राशी असलेले आपले नाते अधिक शाश्वत केले पाहिजे, हा या संकल्पनेचा मुख्य उद्देश आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ अंतर्गत येथे असलेल्या ‘सागरी