मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विचारांचा जागर, दिवाळी अंक परंपरेचा सन्मान मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई यांच्या ५० व्या राज्यस्तरीय दिवाळी अंकांच्या पुरस्काराचे वितरण मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती महाराष्ट्राची अस्मिता, संस्कृती आणि आत्मभान आहे. शिवरायांच्या पराक्रमासोबत मराठी भाषेने स्वराज्याचा स्वाभिमान जपला. आज जगातील पहिल्या १५ प्रमुख भाषांमध्ये मराठीचा समावेश होतो, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. मात्र जागतिकीकरणाच्या युगात मराठी भाषेबाबत वाढत चाललेली उदासीनता गंभीर असून तिची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी केले. दादर सार्वजनिक वाचनालय व काशिनाथ धुरू हॉल ट्रस्ट, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमात मराठी भाषेच्या संवर्धनासोबतच दिवाळी अंक परंपरेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई यांच्या प्रतिष्ठित ५०