विद्यार्थ्यांनी वाचनातून स्वतःला समृद्ध करावे : प्रकाश पवार वाटद कवठेवाडी शाळेत सलग १२ तास वाचन उपक्रम उत्साहात रत्नागिरी खंडाळा (प्रतिनिधी) :निलेश रहाटे आधुनिक भारताचे शिल्पकार, विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी असून त्यांनी वाचनाच्या माध्यमातून स्वतःला समृद्ध करावे, असे मत बौद्धजन पंचायत समिती रत्नागिरी तालुकाध्यक्ष प्रकाश पवार यांनी व्यक्त केले. ते जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, वाटद कवठेवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त शालेय व्यवस्थापन समिती व माजी विद्यार्थी संघाच्या वतीने आयोजित सलग १२ तास वाचन उपक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांचे कार्य विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दिशादर्शक आहे. त्यांच्या विचारांचे आकलन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी चरित्र, साहित्य आणि विविध विषयांवरील पुस्तके वाचण्याची सवय लावणे आवश्यक आहे. शाळेने राबविलेला सलग १२ तास वाचन उपक्रम स्तुत्य व अनुकरणीय असल्याचे त्यांनी नमूद केले. समारोप प्रसंगी उपस्थित