📰 रत्नागिरी जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग अध्यक्षपदासाठी अस्मिता केंद्रे तर उपाध्यक्षपदासाठी विलास चालके यांच्या नावांची जोरदार चर्चा रत्नागिरी : जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अध्यक्षपदासाठी अस्मिता केंद्रे तर उपाध्यक्षपदासाठी विलास चालके यांच्या नावांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. जिल्हा परिषदेत गटनेत्याची निवड 23 तारखेला होणार असल्याने राजकीय हालचालींना अधिकच वेग आला आहे. विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठका, चर्चासत्रे आणि गणिते मांडण्याचे सत्र सुरू झाले असून सत्तेची समीकरणे अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पालकमंत्री उदय सामंत, योगेश कदम तसेच इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सभापतीपद, गटनेतेपद आणि सत्तास्थापनेबाबत सविस्तर चर्चा झाली. जिल्हा परिषदेत स्थिर सत्ता निर्माण करण्यासाठी सर्वसमावेशक फॉर्म्युल्यावर विचारमंथन झाल्याचे समजते. राजकीय गणिते जुळवण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत