₹१२ लाखांच्या ग्रामपंचायत इमारतीचा पूर्णत्वाचा दाखला मिळेना… माहिती आयोगाच्या आदेशानंतरही दाखला प्रलंबित; तांत्रिक व आर्थिक चौकशीची मागणी *रत्नागिरी : निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथील जनसुविधा योजनेंतर्गत सन २०१५–१६ मध्ये सुमारे ₹१२,३६,८०० रुपये खर्चातून बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालय इमारतीच्या कामाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणाची सखोल तांत्रिक व आर्थिक चौकशी करण्याची मागणी RTI कार्यकर्ते व पत्रकार निलेश रहाटे यांनी केली आहे. RTI द्वारे प्राप्त माहितीनुसार, मंजूर नकाशामध्ये Store Room, Sarpanch Room आणि Gramsevak Room अशा तीन स्वतंत्र खोल्यांचा समावेश आहे. मात्र प्रत्यक्ष बांधकामामध्ये Store Room व Sarpanch Room यांच्यामध्ये स्वतंत्र भिंत नसल्याने दोन्ही खोल्या एकत्र असल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे मंजूर नकाशाचा भंग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय कामाच्या ठिकाणी दोन वेगवेगळे फलक आढळून येत असून त्यापैकी एक साधा माहिती फलक आहे.