*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही. मानवतावादानेच मानवी जीवनाचे कल्याण साधता येईल.मानवी जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच यावर एकमेव उपाय आहे. असे स्पष्ट मत भिक्खू संघाचे राष्ट्रीय महासचिव आणि पूज्य भंते डॉ. सुमेध बोधी यांनी केले. चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षण समिती गाव शाखा खरशेत, धम्मभूषण विकास संघ खरशेत मुंबई, यशोधरा महिला मंडळ तसेच सम्यक युवा मंच आयोजित भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न, विश्व भूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव चिपळूण तालुक्यातील खेरशेत येथील तक्षशिला बुद्ध विहाराच्या १० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दुसरे पुष्प गुंफताना पूज्य भंते डॉ. सुमेध बोधी यांनी पाच बौद्ध भिक्खू यांच्या समवेत धम्म देसना देताना केले. बौद्ध भंते डॉ सुमेध बोधी पुढे म्हणाले की, बुद्ध धम्म आपल्याला अज्ञाना