📰 रत्नागिरीत चाकू हल्ला; मिरकरवाडा जेटीजवळ व्यक्तीवर सपासप वार, एक गंभीर जखमी 🔹 : शिमगोत्सवातील किरकोळ वादाचा राग; तिघांविरोधात गुन्हा दाखल, पोलिसांचा तपास सुरू रत्नागिरी : शिमगोत्सवाच्या वेळी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून तिघांनी एका व्यक्तीवर चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. ७) सकाळी सुमारे ११ वाजता मिरकरवाडा जेटीच्या पहिल्या गेटजवळ घडली. या हल्ल्यात जयेंद्र दत्ताराम नार्वेकर (वय ५५, रा. भाटिमिऱ्या, रत्नागिरी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी शशांक सावंत, संजू आणि रुपेश सावंत उर्फ छोटा भाई (तिघेही रा. सडामिऱ्या, रत्नागिरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, रविवारी (१ मार्च) रात्री सुमारे १० वाजता शिमगोत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी पालखी येणार असल्याने भाटिमिऱ्या येथील दत्त मंदिर परिसरात रस्त्यावर