कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी “एक बाठ, एक आशा” संकल्पनेतून पर्यावरण संवर्धन आणि हापूस उत्पादन वाढीसाठी अॅड. महेंद्र मांडवकर यांचे जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन रत्नागिरी : कोकणातील पारंपरिक रायवळ आंबा संवर्धनासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये किमान ५ हजार रायवळ आंब्यांची झाडे लावण्याची व्यापक मोहीम राबवावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य अॅड. महेंद्र रुक्मिणी वसंत मांडवकर यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. “एक बाठ, एक आशा” या संकल्पनेतून ही मोहीम राबविण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी कोकणातील रायवळ आंब्यांचे झपाट्याने कमी होत असलेले प्रमाण आणि त्याचा हापूस आंबा उत्पादनावर होत असलेला परिणाम याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. मांडवकर यांनी निवेदनात नमूद केले आहे की, हापूस आंब्याच्या