राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या नावाखाली तरुणींची फसवणूक; ‘सावध गाव-सुरक्षित गाव’ मोहिमेअंतर्गत जनजागृतीचे आवाहन राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या आणि अनोळखी व्यक्तींच्या माध्यमातून तरुणींची फसवणूक झाल्याच्या दोन दुर्दैवी घटना नुकत्याच उघडकीस आल्या आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘त्रिवेणी लोकसंचलित साधन केंद्र राजापूर’चे व्यवस्थापक राजन लाड यांनी ‘सावध गाव-सुरक्षित गाव’ या शीर्षकाखाली जनजागृतीसाठी महत्त्वाचे आवाहन केले आहे. गावागावात विविध व्यवसाय, विक्री, प्रचार, स्क्रॅच कार्ड, भेटवस्तू योजना किंवा इतर कारणांच्या निमित्ताने अनेक अनोळखी व्यक्ती फिरत असतात. त्यापैकी बहुसंख्य जण प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करत असले तरी काही अपवादात्मक घटना समाजासाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. पोलिस ठाण्यांमध्ये नोंद झालेल्या दोन घटनांमध्ये पहिल्या प्रकरणात स्क्रॅच कार्ड आणि भेटवस्तू योजनेच्या निमित्ताने फिरणाऱ्या एका प्रौढ व्यक्तीने एका तरुणीला फूस लावून तिच्यासोबत पलायन केले. तर दुसऱ्या घटनेत आसरा व रोजगाराची संधी देण्याच्या नावाखाली विश्वास संपादन करून घरातील तरुणीला पळवून नेण्यात आले. या