महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत ऐतिहासिक वाढ; राज्याला देशात दुसरे स्थान नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे कोकणातील मत्स्यव्यवसायाला चालना, कोळंबी निर्यातीत मोठी झेप मुंबई : महाराष्ट्राने मत्स्य निर्यात क्षेत्रात पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत देशात दुसरे स्थान मिळवले आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या योजनांमुळे ही ऐतिहासिक वाढ शक्य झाली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातून तब्बल 7,343 कोटी 40 लाख रुपयांच्या समुद्री उत्पादनांची निर्यात झाली आहे. गेल्या पाच वर्षांत या क्षेत्रात उल्लेखनीय वाढ झाली असून 2020-21 मधील 3,684 कोटी रुपयांच्या तुलनेत निर्यात जवळपास दुप्पट झाली आहे. निर्यातीचे परिमाणही वाढून 2.27 लाख मेट्रिक टनांपर्यंत पोहोचले आहे. राज्याच्या या यशामध्ये कोकण किनारपट्टी हा मुख्य कणा ठरला आहे. विशेषतः कोळंबी आणि गोठवलेल्या मासळीच्या निर्यातीचा मोठा वाटा आहे. कोकणातील कोळंबीला अमेरिका, चीनसारख्या देशांमध्ये मोठी मागणी असून तिची गुणवत्ता आणि चव यामुळे परदेशी