पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी कंपन्यांनी आखडला हात, आंबा उत्पादक ‘आगीतून फुफाट्यात’ रत्नागिरी: कोकणातील आंबा बागायतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला खरा, मात्र त्याचा उलटा परिणाम होताना दिसत आहे. कॅनिंग कंपन्यांना ५० रुपये किलो दर देण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले होते, परंतु या आदेशाला केराची टोपली दाखवत कंपन्यांनी आता थेट आंबा खरेदीच बंद केली आहे. यामुळे हवालदिल झालेल्या बागायतदारांची अवस्था ‘आगीतून फुफाट्यात’ अशी झाली आहे. नेमके प्रकरण काय? वाढत्या उष्म्यामुळे झाडांवरील आंबा वेगाने तयार होत आहे. परिणामी, बाजारपेठेत आंब्याची आवक प्रचंड वाढली आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) कोकणासह इतर राज्यांतूनही मोठ्या प्रमाणावर आंबा दाखल झाल्याने दर कोसळले आहेत. अशा स्थितीत बागायतदारांना कॅनिंग कंपन्यांचा आधार होता. मात्र, कंपन्यांनी ५० रुपयांऐवजी दर थेट ३० रुपयांपर्यंत