मुंबई आपलीच! मराठी अस्मितेचा एल्गार आणि आताची जबाबदारी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लढा अस्मितेचा….. लढा स्वाभिमानाचा....

मुंबई आपलीच! मराठी अस्मितेचा एल्गार आणि आताची जबाबदारी

???? मराठी भाषा आणि आपली प्राचीन संस्कृती टिकवण्यासाठी दोन्ही ठाकरेबंधूंना तमाम महाराष्ट्राने साथ देऊया अन्यथा छत्रपतींचा इतिहास आम्हाला हिंदीमध्ये वाचावा लागेल.

???? एक दिवस मराठी मातीसाठी ????

मराठी माणसाच्या मनातली मुंबईची सल आणि तिचं महत्व किती खोलवर रुजलेलं आहे, हे आपण सारेच जाणतो. आजही, जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न येतो, तेव्हा मुंबई हे नाव अग्रस्थानी येतं. आज आपण केवळ मुंबईच्या भौतिक अस्तित्वाची नाही, तर तिच्याशी जोडलेल्या मराठी भाषा, संस्कृती आणि इतिहासाची गोष्ट करत आहोत.

१९६० ला जे जमलं नाही त्याचा बदला घेण्याची तयारी….

आपल्यापैकी अनेकांना संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा इतिहास आठवत असेल किंवा आपण तो ऐकला असेल. स्वातंत्र्यानंतर भाषिक राज्यांच्या निर्मितीचा विचार पुढे आला, तेव्हा मुंबईचा प्रश्न ऐरणीवर आला. १९६० पूर्वी, मराठी भाषिक विदर्भ प्रांत वगळून आणि गुजराती भाषिक राजकोटच्या उत्तरेकडील प्रांत वगळून ‘द्विभाषिक राज्य’ निर्माण करण्यात आलं होतं. नंतर भाषावार प्रांतरचना करताना, मुंबई कोणाला द्यायची – महाराष्ट्राला की गुजरातला? हा मोठा प्रश्न होता.

याच प्रश्नावर, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठी मोठी चळवळ सुरू झाली. या आंदोलनाने इतकं उग्र रूप धारण केलं की, मुंबईत प्रचंड मोर्चे निघू लागले. फ्लोरा फाउंटन चौकात पोलिसांनी मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला, पण मराठी बांधवांनी जोरदार मुसंडी मारली. दुर्दैवाने, तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाईंनी गोळीबाराचा आदेश दिला. या अमानुष गोळीबारात १०५ मराठी मोर्चेकऱ्यांनी आपले प्राण गमावले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं. आजही तो चौक हुतात्मा चौक म्हणून ओळखला जातो आणि तिथे हुतात्म्यांचे भव्य स्मारक उभे आहे, जे आपल्याला त्या बलिदानाची आठवण करून देतं.

या प्रचंड जनरोषामुळे मोरारजी देसाईंना हटवण्यात आलं आणि अखेर मुंबई महाराष्ट्रात विलीन झाली. पण हे लक्षात घेण्यासारखं आहे की, मुंबई महाराष्ट्राला मिळाली याचा मोठा रोष आजही गुजराती जनतेच्या मनात आहे. महाराष्ट्राने मुंबईच्या बदल्यात गुजरातला तेव्हा ६० कोटी रुपये दिले, म्हणजेच आपल्या पूर्वजांनी मुंबई विकत घेतली आहे. त्यामुळे ती मराठी माणसाची आहे, यावर आपला ठाम विश्वास आहे.

शिवसेनेचा जन्म आणि मराठी अस्मितेची लढाई

मुंबई हातातून निसटल्याची ‘सल’ तेव्हापासून गुजराती जनतेच्या मनात आजही रुतून बसली आहे. मराठी जनतेचा आवाज बनून तिच्या हक्कांसाठी लढणारी एखादी संघटना असावी, हा विचार त्यावेळी प्रबळ झाला. बाळासाहेब ठाकरे या अभ्यासू आणि आक्रमक वक्त्याकडे या संघटनेचे नेतृत्व द्यावे हेही निश्चित झाले. आणि मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी बाळासाहेब ठाकरेंनी ‘शिवसेना’ स्थापन केली.

आजही, मुंबईवर ताबा मिळवण्यातील मोठा अडथळा ‘शिवसेना’ आहे, हे ओळखून शिवसेनेलाच मोडून काढण्याचा धूर्त राजकीय ‘डाव’ खेळला जात आहे, अशी अनेकांची भावना आहे. हा डाव समजून घेणे आणि त्याला प्रतिकार करणे, हे आज आपल्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे.

मराठी माणसाची एकी: काळाची गरज!

मराठी भाषेसाठी एक झालेले मनसे आणि शिवसेना हे राजकीय पक्ष म्हणून न पाहता, त्यांच्याकडे मराठी संघटना म्हणून पाहूया. श्री. राज ठाकरे यांच्याकडे अफाट वक्तृत्व आहे, लाखांच्या सभा घेण्याचं कौशल्य आहे, तर श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे संघटन कौशल्य आहे. या दोन्ही शक्तींनी एकत्रितपणे मराठी माणसाच्या हितासाठी उभं राहणं ही काळाची गरज आहे.

आज राज्यातील फडणवीस सरकार परप्रांतीय धार्जिणे असल्याचं चित्र दिसतंय. राज्यात आताच ‘जय गुजरात’चे नारे सुरू झाले आहेत, उद्या ‘जय यूपी बिहार’ही म्हणतील. मग येथील मराठी माणसाचं काय? आपण आज जर तटस्थ राहून बघ्याची भूमिका घेतली, तर १९६० ला मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी ज्या १०५ हुतात्म्यांनी स्वतःचं बलिदान दिलं, ते आपल्याला माफ करतील का?

इतिहासात मराठे आपापसात जेवढे लढले तेवढे मुघलांशी लढले असते तर दिल्लीचेही तख्त मिळवले असते, हा इतिहास खोटा ठरवण्याची हीच ती मराठी माणसाची वेळ आहे. आपली एकी दाखवूया, मराठी भाषेसाठी, मराठी संस्कृतीसाठी, आणि आपल्या हक्काच्या मुंबईसाठी एकजुटीने उभं राहूया!

जय महाराष्ट्र! जय मराठी!

बातमी साभार – प्रकाश पेंडसे ज्येष्ठ पत्रकार 

संकलन – सुजेंद्र सुर्वे, संपादक –       रत्नागिरी वार्ताहर 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा गुहागर | प्रतिनिधी...
Read More
कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!  माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ...
Read More
तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)...
Read More
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

डोंबिवलीत 'लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी'चा थरार; 'तनुजा ११ आबलोली' ठरला महाविजेता! संदेश दादा काताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी भव्य आयोजन...
Read More
डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया...
Read More
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज   केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेले...
Read More
कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत नवीमुंबई (प्रतिनिधी )-गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गावचे सुपुत्र सध्या...
Read More
वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या जिल्हा महिला विभाग सचिवपदी पत्रकार किरणताई वाघ यांची निवड

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या जिल्हा महिला विभाग सचिवपदी पत्रकार किरणताई वाघ यांची निवड   देऊळगाव राजा : भारत सरकार नोंदणीकृत...
Read More
ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या जिल्हा महिला विभाग सचिवपदी पत्रकार किरणताई वाघ यांची निवड
Play sound