⚡ वीज क्षेत्रात महाराष्ट्राची झळकली कामगिरी!
महावितरणला केंद्र सरकारकडून १०० पैकी तब्बल ९३ गुण; देशात प्रथम क्रमांक
मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण)ने वीज क्षेत्रात भक्कम कामगिरी करून देशात अव्वल स्थान पटकावले आहे. केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या मानांकनात महावितरणला १०० पैकी तब्बल ९३ गुण मिळाले असून, महाराष्ट्राने पश्चिम भारतात पहिला क्रमांक मिळवला आहे.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील ऊर्जा क्षेत्रातील धोरणात्मक कामगिरी, ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर व अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाले.
ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने आरईसी व पॉवर फाउंडेशन ऑफ इंडिया यांनी हे मानांकन निश्चित केले. महाराष्ट्रानंतर मध्यप्रदेश (८४.५ गुण), गोवा (७४ गुण), दादरा-नगर हवेली व दीव दमण (७४ गुण), गुजरात (६७ गुण) आणि छत्तीसगड (५२ गुण) या राज्यांचा क्रमांक लागतो.
✨ महावितरणच्या कामगिरीतील ठळक मुद्दे :
- संसाधन पर्याप्तता, ऊर्जा परिवर्तन आणि नियामक प्रशासनात पैकीचे पैकी गुण
- आर्थिक स्थैर्यात २५ पैकी २४ गुण
- जीवन व व्यवसाय सुलभतेत २३ पैकी १७ गुण
- ग्राहक सेवा सुधारणा, ऊर्जा परिवर्तन आराखडा आणि वीज दर कपात हे महत्त्वाचे घटक
महावितरणने मागील तीन वर्षांत ग्राहक सेवेत सुधारणा, भावी वीज मागणीचे नियोजन आणि ४५ हजार मेगावॅट वीज खरेदी करार केले. नवीकरणीय ऊर्जेला प्राधान्य दिल्यामुळे राज्याला पुढील पाच वर्षांत तब्बल ६६ हजार कोटींची बचत होणार आहे. त्यामुळे सर्व ग्राहकांच्या वीजदरात कपातही करण्यात आली आहे.
तसेच, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत १६ हजार मेगावॅट सौर प्रकल्प सुरू असून, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे. शेतांमध्ये सौर पंप बसविण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.
आरडीएसएस योजनेअंतर्गत पायाभूत सुविधांचा विकास सुरू असून, त्याचा थेट फायदा ग्रामीण आणि शहरी ग्राहकांना होणार आहे.
📷
🔖 हॅशटॅग :
#महाराष्ट्र #महावितरण #वीज #ऊर्जा_परिवर्तन #देवेंद्रफडणवीस #मेघना_साकोरेबोर्डीकर #वीजदरकपात #सौरऊर्जा #वीजपुरवठा
त















