■ राजापूर अर्बन बँक खोट्या कर्ज प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी
■ जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांना पत्र देऊन फसवणूक झालेल्या सभासदांनी केली मागणी
■ समिर शिरवडकर-रत्नागिरी.
राजापूर:- राजापूर :- रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधील नामवंत बँक राजापूर अर्बन को.ऑप. बँक राजापूर च्या रत्नागिरी शाखेत काही दिवसांपूर्वी करोडो चा घोटाळा मिडीयाच्या माध्यमातून उघडकीस आला होता.रत्नागिरी शाखाधिकारी यांच्यवर बँकेने कारवाई केली,मात्र गोरगरीब सभासदांच्या मनात भितीचे वातावरण पसरले आहे,त्याचे कारण असे की,रत्नागिरी शाखेमध्ये सभासदांच्या नावे खोटी कर्जप्रकरणे करून,पुन्हा त्यांना दुसऱ्या खोट्या कर्ज प्रकरणात जामीन म्हणुन देऊन,सभासदांनी बँकेला दिलेल्या कागदपत्रांचा गैरव्यवहार झाला आहे.
■ *काय म्हटलंय तक्रारीत*
राजापूर अर्बन बँक को.ऑप.राजापूर रत्नागिरी शाखे मध्ये खोटी कर्जपप्रकरणे तसेच खोटे जामीनदार देउन खोट्या साह्य करून जमा असलेल्या कागदपत्रांचा गैरव्यवहार करून कर्ज प्रकरणे मंजूर करून घेउन आम्हला कोणत्याही प्रकारची कल्पना न देता मंजूर केली असुन,सहाय्यक निबंधक सहकारी संस्था रत्नागिरी यांचेकडील कलम १०१ ची नोटिस आल्यावर सदर प्रकरणची माहिती झाली.त्यामुळे आम्हाला सर्व खाली साह्य करणाऱ्या सभासदांना आमची फसवणूक झाली असल्याचे समजले. तेंव्हा आम्ही ही लेखी तक्रार देत असून यावर सखोल चौकशी करून आम्हा सभासदांना न्याय मिळावा अश्या अश्यायाचे पत्र असून त्यावर वीस सभासदांच्या साह्य आहेत.
■ दि.११ सप्टेंबर २५ रोजी बँकेला लेखापरीक्षण अहवालात “ड” वर्ग वरून “ब” वर्ग दिल्याचे समजते.परंतु रत्नागिरी च्या शाखेत सन २०२४-२०२५ ला रत्नागिरी शाखेत करोडो चा घोटाळा झाला असून (सनदी लेखापाल ) लेखापरीक्षणाती यांचा अहवाल म्हणजे जादूई कांडी तर नाही ना?असा प्रश्न फसवणूक झालेल्या सभासदांना पडला आहे.
या,तक्रारींवर जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी कोणती भूमिका घेतात याकडे समस्त रत्नागिरीकरांचे लक्ष लागले आहे.















