भारत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत : अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भारत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत : अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आशिया कप २०२५ मधील सुपर फोर सामन्यात भारताने बांगलादेशवर ४१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताचा हा या स्पर्धेतील सलग पाचवा विजय ठरला. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत १६८ धावा केल्या आणि प्रतिस्पर्ध्यास १६९ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात बांगलादेशाचा डाव १९.३ षटकांत १२७ धावांवर गुंडाळला गेला.

नाणेफेक बांगलादेशाने जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतासाठी अभिषेक शर्मा चमकदार ठरला. त्याने केवळ ३७ चेंडूत ७५ धावा करत सामन्याचा पाया रचला. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ५ षटकार फटकावले. अभिषेक आशिया कप स्पर्धेतील नवा सिक्सर किंग ठरला. त्याला शुभमन गिलने १९ चेंडूत २९ धावांचे योगदान दिले, तर हार्दिक पांड्याने ३८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. भारताने २० षटकांत १६८/६ अशी मजल मारली.

बांगलादेशकडून तंजिम हसन साकिब, मुस्ताफिझुर रहमान आणि मोहम्मद सैफुद्दीन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला, तर रिषाद हुसैनने २ गडी बाद केले.

१६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा सलामीवीर सैफ हसन ६९ धावांसह झुंजार लढला. पण त्याला योग्य साथ लाभली नाही. परवेज हुसैन इमोनने २१ धावा केल्या; मात्र त्यानंतर बाकीच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी बांगलादेशच्या आशा संपवल्या.

भारतीय गोलंदाजांपैकी कुलदीप यादव सर्वाधिक यशस्वी ठरला. त्याने ४ षटकांत केवळ १८ धावा देत ३ गडी बाद केले. बुमराह आणि चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २, तर तिलक वर्मा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

या सामन्याचा सामनावीर अभिषेक शर्मा ठरला. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताला निर्णायक धावसंख्या उभारता आली आणि अखेरीस ४१ धावांनी विजय मिळवून भारतीय संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला.

भारताचा पुढचा सामना २६ सप्टेंबर २०२५ रोजी दुबईमध्ये श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

  गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत...
Read More
गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा गुहागर | प्रतिनिधी...
Read More
कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!  माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ...
Read More
तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)...
Read More
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

डोंबिवलीत 'लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी'चा थरार; 'तनुजा ११ आबलोली' ठरला महाविजेता! संदेश दादा काताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी भव्य आयोजन...
Read More
डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया...
Read More
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज   केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेले...
Read More
कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत नवीमुंबई (प्रतिनिधी )-गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गावचे सुपुत्र सध्या...
Read More
वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत
Play sound