💥 ठाकरे गटाचा दसरा मेळावा 💥
🟣 “तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा, मग आमच्याशी हिंदुत्वाबद्दल बोला” – उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
मुंबई :
मुंबईतील शिवसेना (ठाकरे गट) चा दसरा मेळावा यंदा मुसळधार पावसात पार पडला. या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केला. हिंदुत्वावरून भाजपकडून ठाकरे गटावर होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना ठाकरे म्हणाले, “तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आणि मग आमच्याशी हिंदुत्वाबद्दल बोला.”
ठाकरेंनी आपल्या भाषणात भाजपवर सडकून टीका करताना म्हटलं –
- “लढेल तो तुरुंगात जाईल, ही सरकारची वृत्ती आहे. कमळाबाईनं देशभर चिखल करून ठेवला आहे.”
- “मणिपूर तीन वर्षांपासून जळत आहे. तेथील महिलांची धिंड निघाली, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले नाहीत. आता गेले तेव्हा पीडितांना भेटलेही नाहीत.”
- “भाजप आता अमिबा झाला आहे, पाहिजे त्यांच्यासोबत युती करतो.”
मुख्यमंत्रीपदाच्या लोकप्रियतेच्या सर्व्हेतही उद्धव ठाकरेंनी सध्याच्या शिंदे सरकारवर टीका केली. “आमची सत्ता असताना मुख्यमंत्री पहिल्या पाचात होता, आता मुख्यमंत्री दहाव्या क्रमांकावर आहेत,” असे ते म्हणाले.
धर्माबाबत बोलताना ठाकरे म्हणाले –
“धर्म घरामध्ये ठेवा. आम्ही हिंदू आहोत, कुणी मुस्लिम आहेत, कुणी ख्रिश्चन आहेत, पण राष्ट्रधर्म एकच हवा – हिंदुस्थान.”
शेतकरी प्रश्नावरही ठाकरेंनी सरकारला धारेवर धरले. “मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. पण आजही फडणवीस सरकारने २०१७ मध्ये दिलेली कर्जमाफीची घोषणा पूर्ण केली नाही. शेतकऱ्यांना दर हेक्टरी ५० हजारांची मदत द्या,” अशी मागणी त्यांनी केली.
भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर टीका करत उद्धव ठाकरेंनी ठामपणे सांगितले –
“कमळाबाईनं आपली कमळं फूलवून घेतली, पण चिखल केलाय. जे गेले ते पितळ होतं, पण जे राहिले ते माझ्याकडचं खरं सोनं आहे.
🔖 हॅशटॅग्स :
#UddhavThackeray #DussehraMelava #ShivSenaThackerayGroup #BJP #Hindutva #MumbaiPolitics #Maharashtra















