गुहागर शिवसेना क्षेत्र प्रमुख श्री. आनंद भोजने यांचे जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना
ओव्हरलोड वाहतुकीविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा
📰 गुहागर तालुक्यातील आबलोली सह मुख्य रस्ता वारंवार खचतो — शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आनंद भोजने यांनी दिलाय आंदोलनाचा इशारा
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील आबलोलीसह मुख्य रस्ता वारंवार खचत आहे.
सावर्डे – तवसाळ – आबलोली – मासू हा रस्ता रत्नागिरी आणि चिपळूणला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून, या मार्गावरून दररोज अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत आहे
गुहागर, दि. १३/१०/२०२५
गुहागर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (श्री. आनंद भोजने) यांनीआबलोली मार्गे जयगड-निवळी रस्त्यावर सुरू असलेल्या ओव्हरलोड वाहतुकीविरोधात जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे निवेदन देऊन आंदोलनाची मागणी केली आहे. या भागातील नागरिकांचे जीवन धोक्यात आणणाऱ्या व रस्त्यांची दुरवस्था करणाऱ्या या वाहतुकीमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये असंतोष पसरला आहे.

या संदर्भात, आनंद भोजने यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य (मा. एकनाथ शिंदे साहेब) आणि उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य (मा. उदय सामंत साहेब) यांच्यासह अनेक महत्त्वाच्या मंत्र्यांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे.
आंदोलनाची प्रमुख कारणे आणि मागण्या
* अबलोली ओव्हरलोड वाहतूक: याच मार्गावरून काताळे येथे असलेल्या बोक्साईट्स उत्खनन व बंदरावर होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अवजड डंपर व ट्रक वारंवार ओव्हरलोड वाहतूक करतात, ज्यामुळे रस्त्यांवरील डांबर उखडले जाऊन अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.
* अपघाताचा धोका: ओव्हरलोड वाहतुकीमुळे अपघातांचा धोका वाढला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. लोकांना जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो.
* प्रशासनाच्या परवानग्या: या रस्त्यावर २५ ते ३० टन वाहतूक करण्याची क्षमता असतानाही, स्थानिक प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) कडून ओव्हरलोड वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
* कंपनीची मनमानी:
* रस्ते दुरुस्तीची मागणी फेटाळली: परिसरातील लोकांनी ओव्हरलोड वाहतुकीमुळे झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी केली असता, संबंधित कंपनीने ही मागणी फेटाळून लावली.
* मनमानी व दादागिरी: वाहतुकीमुळे स्थानिकांना होणाऱ्या त्रासाकडे कंपनी दुर्लक्ष करत आहे. तसेच, कंपनीकडून पोलिसांच्या संरक्षणात मनमानी केली जात आहे आणि स्थानिकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत.
* चौकीची मागणी: कंपनीने जेएसडब्ल्यू आणि अशोक निलकंठ या कंपन्यांना मदत करण्यासाठी रेल्वे गेटवर पोलिस चौकी बसवण्याची सोय केली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होत आहे.
* आंदोलनाची तारीख: ओव्हरलोड वाहतूक बंद न झाल्यास, दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी आबलोली , तवसाळं ,जयगड- या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
या आंदोलनातून ओव्हरलोड वाहतूक तत्काळ थांबवावी, दोषींवर कारवाई व्हावी, आणि स्थानिकांच्या समस्यांचे निराकरण करावे, अशी मागणी श्री. आनंद भोजने यांनी केली आहे.
या सततच्या अवजड वाहतुकीचा थेट परिणाम याच रस्त्यावर होत आहे.
🔹 रस्त्याच्या साईडपाट्या खचल्या असून, अनेक ठिकाणी रस्ता तुटला आहे.
🔹 वाहतुकीचा वेग आणि ओव्हरलोड वाहने यामुळे रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
संदर्भ: श्री. आनंद भोजने, विधानसभा क्षेत्रप्रमुख गुहागर (शिवसेना) यांच्यावतीने जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांना सादर केलेले निवेदन व मागणीपत्र.
वार्तांकन -सुजित सुर्वे ,पडवे















