संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठा घोटाळा हा रेशनिंग (शिधा वाटप) आणि उत्पन्नाचा दाखल काढण्यासाठी होतो….धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री अमोल धनराज केंद्रे
प्रतिनिधी अरविंद कोठारी
दिवा,राशन दुकारणार नागरिकांना राशन कमी देऊन उर्मट पने वागत आहेत.नागरिकांना हक्काचे राशन म्हणजे अन्न सुरक्षा योजनेतून मिळणारे प्रति व्यक्ती २ किलो गहू,आणि ३ किलो तांदूळ मिळतात.परंतु प्रत्यक्षात याची अंमलबजावणी राज्यात कोठेही व्यवस्थित होत नसून राशन कमी देऊन नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात चालू आहेत.याचाच भाग म्हणून ठाणे जिल्ह्यातील दिवा पूर्व येथील सेंट मेरी शाळेच्या बाजूला असणाऱ्या अधिकृत शिधा वाटप दुकान क्र.U-MUM ४८ फ ११३ येथे काल दिनांक ०९/ ११/२०२५ रोजी प्रत्यक्ष पाहणी करून सत्य परिस्थिती जाणून घेतली.त्या संबंधी राशन दुकान लायसन्स दुसऱ्याच्या नावे असून ते कोणीही त्या शॉप वर बसत नाहीत.तिसरे व्यक्ती राशन दुकान सांभाळत असून प्रत्येक नागरिकाच्या मागे १ किलो गहू किंवा तांदूळ कमी देऊन सामान्य जनतेची फसवणूक करत असल्याचे उघडकीस आणले.संबंधित प्रकरणी सोशल मीडिया तसेच वर्तमानपत्र बातमी पाहून जागृत नागरिकांनी त्यांचीही अशीच फसवणूक होत असल्याचे सांगितले.तसेच नागरिकांना तुमची के वाय सी करूनही दिसत नाही..तुमचे राशन कार्ड दुसऱ्या ठिकाणचंइथे मिळणार नाही असे सांगतात.तर काही लोकांना तुमचे रेशनिंग कार्ड दुसऱ्या ठिकाणचे आहे.कमी मिळणार असे सांगून भ्रष्टाचार करत असून सदर भ्रष्टाचार करणाऱ्या राशन दुकानदाराचे लायसन्स रद्द करून कार्यवाही करणे.
२)सदर प्रकार ठाणे जिल्ह्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हे सर्रास पने घडत असून रेशनिंगचे तांदूळ गहू यांची क्वालिटी ही सुधारण्यात यावी.आपण आपल्या मार्फत रेशनिंग अधिकारी रेशनिंग दुकारणार यांना सक्त आदेश देऊन आदेशाचे पालन न केल्यास तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी आम्ही आपणास करतो.सदर विषय गांभीर्याने घेऊन जनतेला त्यांच्या हक्काचे राशन मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे.आपण आपल्या मार्फत शासनास कळवावे की बिगारी काम करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न देखील एक लाख पेक्षा जास्त आहे.परंतु राशन कार्ड साठी उत्पन्न एक लाख पेक्षा कमी लागते. त्यामुळे सामान्य जनतेच्या भावना लक्षात घेऊन वार्षिक उत्पन्नाच्या दाखल्यात ३ लाख पर्यंतची वाढ करण्यात यावी.जेणे करून उत्पन्नाचा दाखल काढण्या मागे होत असलेला भ्रष्टाचार कमी होईल.आणि जनतेला न्याय मिळेल. धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री अमोल धनराज केंद्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच जिल्हाधिकारी ठाणे यांना निवेदन दिले आहे.यावेळी विनोद कदम,संजय बारस्कर,इब्राहिम आ शेख शिष्टमंडळात उपस्थित होते.















