वाटद–मिरवणे ग्रामपंचायतीत अखेर बायोमेट्रिक हजेरी सुरू – दिड वर्षांच्या पाठपुराव्याला यश

ratnagiri news

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वाटद–मिरवणे ग्रामपंचायतीत अखेर बायोमेट्रिक हजेरी सुरू – दिड वर्षांच्या पाठपुराव्याला यश

 

रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे

वाटद–मिरवणे ग्रामपंचायतीत शासन निर्णयानुसार बायोमेट्रिक हजेरी सक्तीने लागू करणे बंधनकारक असूनही गेल्या दीड वर्षांपासून या निर्णयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर प्रश्न सतत उपस्थित होत होता. ग्रामीण भागात शासकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीविषयी अनेकदा शंका उपस्थित केल्या जातात. वेळेवर हजर न राहणे, कामकाजात विलंब, नागरिकांना त्रास अशा तक्रारी सामान्य झाल्या आहेत.

 

या सर्व परिस्थितीचा पाठपुरावा माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघाचे मुख्य संपर्क प्रमुख व पत्रकार श्री. निलेश रहाटे यांनी सातत्याने केला. माहिती अधिकाराचा वापर करून अनेकदा कागदपत्रे मागविणे, ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर तक्रारी करणे, लेखी व मौखिक पाठपुरावा, अशा अनेक टप्प्यांतून मागणी वारंवार पुढे रेटली गेली. परंतु, स्थानिक प्रशासनाकडून कोणतीच ठोस हालचाल दिसत नव्हती.

 

दरम्यान, शासनाच्या स्पष्ट परिपत्रकानुसार सर्व शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी सक्तीची आहे. ग्रामीण भागातील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि उपस्थितीची शिस्त राखण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र वाटद–मिरवणे ग्रामपंचायत हा निर्णय लागू करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप सातत्याने होत होता.

 

शेवटी श्री. निलेश रहाटे व जागृत ग्रामस्थ यांनी १७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रशासन ला जाग येण्यासाठी ग्रामपंचायत समोर ढोल वाजउन उपोषणाला बसण्याचा इशारा देत निर्णायक पाऊल उचलले. यानंतर ग्रामपंचायतीत खळबळ उडाली आणि तातडीने बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर आजपासून ग्रामपंचायतीत बायोमेट्रिक हजेरी सुरू झाली असून नागरिकांनी याचे स्वागत केले आहे.

 

या निर्णयामुळे—

• कर्मचारी उपस्थितीवर नियंत्रण येणार

• अनियमितता कमी होणार

• शासकीय कामकाज पारदर्शक होणार

• नागरिकांना वेळेवर सेवा मिळण्यास मदत होणार

 

स्थानिक नागरिकांनी हा विजय RTI चळवळीचा आणि सातत्यपूर्ण जनआंदोलनाचा परिणाम असल्याचे मत व्यक्त केले आहे. तर पत्रकार निलेश रहाटे यांनी सांगितले की, “शासनाचे आदेश कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरले पाहिजेत. ग्रामपंचायतीत पारदर्शकता प्रस्थापित हीच या लढ्याची प्रेरणा होती.”

वाटद–मिरवणे ग्रामपंचायतीत बायोमेट्रिक हजेरी लागू झाल्यानंतर परिसरातील इतर ग्रामपंचायतींवरही आता दबाव येणार असल्याचे चित्र दिसत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

  गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत...
Read More
गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा गुहागर | प्रतिनिधी...
Read More
कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!  माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ...
Read More
तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)...
Read More
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

डोंबिवलीत 'लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी'चा थरार; 'तनुजा ११ आबलोली' ठरला महाविजेता! संदेश दादा काताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी भव्य आयोजन...
Read More
डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया...
Read More
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज   केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेले...
Read More
कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत नवीमुंबई (प्रतिनिधी )-गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गावचे सुपुत्र सध्या...
Read More
वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत
Play sound