भाट्ये समुद्रात पर्यटकांवर जीवघेणा प्रसंग; स्थानिक तरुणांनी वेळीच धाव घेत वाचवले प्राण

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भाट्ये समुद्रात पर्यटकांवर जीवघेणा प्रसंग; स्थानिक तरुणांनी वेळीच धाव घेत वाचवले प्राण

 

रत्नागिरी : सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी रत्नागिरीत आलेल्या सोलापूरच्या दोन पर्यटकांवर भाट्ये समुद्रात जीवघेणा प्रसंग ओढवला. मात्र स्थानिक तरुणांनी दाखवलेल्या धाडस, चपळाई आणि समयसुचकतेमुळे दोघांचे प्राण वाचले. रविवारी दुपारी साधारण २.३० वाजण्याच्या सुमारास हा थरारक प्रकार घडला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, तेजा तमन्ना मेत्रे (२२) आणि ऋषिकेश राजशेखर कोळी (२३, दोघेही रा. रविवार पेठ, शेळगी, जि. सोलापूर), हे रविवारी भाट्ये समुद्रकिनारी फिरण्यासाठी आले होते. दुपारी सुमारे १ वाजता ते समुद्रात पोहण्यासाठी उतरले. जवळपास दीड तास समुद्राच्या पाण्यात राहिल्यानंतर अचानक खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांना दमछाक होऊ लागली आणि ते गटांगळ्या खाऊ लागले.

 

परिस्थिती गंभीर होताच दोघांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. त्यांचा आर्त किंकाळ्या किनाऱ्यावर ऐकू येताच भाट्ये गावातील तरुणांनी क्षणाचाही विलंब न लावता मदतीसाठी धाव घेतली. किरण अशोक भाटकर यांनी तातडीने आपली ‘कृष्णा’ स्पीड बोट समुद्रात उतरवली. त्यांच्या सोबत पराग चंद्रकांत भास्कर, संचित प्रवीण भाटकर, आदित्य मिलिंद भाटकर आणि महेश नथुराम पिलणकर यांनीही बोटीतून खोल पाण्याकडे कूच केली.

 

काही मिनिटांच्या या श्वास रोखून धरणाऱ्या बचावकार्यात त्यांनी तेजा आणि ऋषिकेश या दोघांनाही सुरक्षितपणे बोटीत खेचून घेत किनाऱ्यावर आणले. वेळीच केलेल्या या बचावकार्यातील धाडसी भूमिकेमुळे दोघांचे प्राण थेट मृत्यूच्या दारातून परत फिरले.

 

दोघेही पर्यटक सध्या पूर्णपणे सुरक्षित असून त्यांनी आपला जीव वाचवणाऱ्या सर्व तरुणांचे मनापासून आभार मानले आहेत.

 

रत्नागिरीतील समुद्रकिनारे वर्षभर पर्यटकांनी गजबजलेले असतात. मात्र भरती-ओहोटीचा अंदाज, समुद्रातील प्रवाह, खोल पाण्याची मर्यादा आणि सुरक्षेचे नियम याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचे स्थानिकांचे मत आहे.

 

प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांकडून पर्यटकांना नेहमीच सतर्क राहण्याचे, सूचनाफलक व सुचना पाळण्याचे आवाहन करण्यात येते. भाट्ये ग्रामस्थांनी दाखवलेल्या तत्परतेचे आणि धाडसाचे मात्र सर्वत्र कौतुक होत असून, “समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षेत स्थानिकांचा सहभाग किती महत्वाचा आहे याचे हे उत्तम उदाहरण” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत मोठी...
Read More
जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका

गुढीपाडवा मेळावा २०२६: 'महाराष्ट्र धर्मा'साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका मुंबई: प्रतिनिधी मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाच्या...
Read More
गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका