नगर पंचायत निवडणुक प्रचारात गुहागर मोहल्यात आमदार भास्कर जाधव यांची तोफ धडाडली
पालकमंत्र्यांसह विरोधकांचा घेतला समाचार
आबलोली (संदेश कदम )
पहिला तुमचा प्रश्न आहे तो म्हणजे कब्रस्तानचा तुम्हाला माहिती आहे शब्बीरभाई हा कबरस्तानचा प्रश्न शेवटपर्यंत आपण सोडवत आणला होता. सत्ता बदलली. गेल्या आठ वर्षात हा प्रश्न का नाही व यांनी सोडवला? आणि आता निवडणुका आली आणि त्यांना आठवण आली. आणि तुम्ही त्यांचेवर विश्वास ठेवणार हा प्रश्न त्यांनी आठ वर्षात का नाही सोडवला? आमची सत्ता गेली आम्ही संपूर्ण पूर्तत: केली होती. आता इथे नगराध्यक्षा स्नेहा वरंडे आहेत, जयदेव मोरे आहेत. शब्बीर भाई आणि जयदेव सारखेच खेपा मारायचे. तुमच्या इथे गटार ओपन होते. त्याचे डास तुम्हाला त्रास द्यायचे अशी तक्रार होती बरोबर आहे ना? यासाठी 15 लाख रुपये निधी मी मंजूर केला त्याचे टेंडर पण निघालेय जे होय म्हणतात त्यांना बोलवा इकडं, हे जे काय पत्र दिलं होतं ना? आमच्या पालकमंत्र्यांनी दिले. आमच्या पालकमंत्र्यांनी दिले ते बेअकली आणि मानणारे त्याच्यापेक्षा बेअकली असा टोला हाणून भास्कर जाधव यांनी स्पष्ट खुलासा केला की,
अरे ज्या वेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते. त्या सरकारने नियम केला की, डीपीसी म्हणजे जिल्हा नियोजन मंडळाला जेवढा फंडस असेल त्यातला पाच टक्के फंड हा शहरातल्या विकास कामांना द्यायचा. नीधी 400 कोटी रुपयांचा असेल तर 20 कोटी रुपये हे शहरा करता द्यायचे म्हणजे लोकसंख्येप्रमाणे वाटायचे. कोणी नसला तरी ते पैसे तुम्हाला मिळणारच आहेत. पालकमंत्र्यांनी एवढे मोठे कौतुक करण्याची गरज नाही. आणि यांनी नाकाला जी लावण्याची गरज नाही. हे आमच्या काळात झालं होतं साधक पत्र ही एखाद्या अधिकाऱ्याला दिले तरी माजी नगराध्यक्ष जयदेव ने जरी पत्र दिले तरी ते पैसे मिळतातच आम्ही चार कोटी आणले, चार कोटी आणले काय चार कोटी आणले. कुठून आणले, कसे आणले, दुसरी गोष्ट उर्दू शाळेचे पेवर ब्लॉक तुम्ही बसवायला मागितले होते ना? मी नाराज होतो खरं सांगायला गेलो तर पण आज मला सांगताना आनंद होत आहे की, या उर्दू शाळेला आपण पेवर ब्लॉक मंजूर केले आहे. ते बसवण्याचं काम आपण करू. कब्रस्तानचा प्रश्न मी सांगितला मदरशाचे सांगितलं. दिवस रात्र तुमच्यासाठी आम्ही उभे राहू शकतो. बटेंगे तो कटेंगे वाले उभे राहू शकत नाही. ते काटण्या करताच उभे राहतील. पण बटेंगे तो कटेंगे, कटेंगे तो बटेंगे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली. 75 वर्ष लोक आपापल्या परीने शेजारी बाजार यांची चांगले वागतात राहतात पण हे दररोज येऊन विष काळवण्याचे काम करतात. असले काम आम्ही केले नाही. आम्ही कामे सांगतो आणि तुमची मदत मागतो. आणि म्हणून या तिन्ही उमेदवारांना समीर बागकार असतील, संतोष शेट्ये असतील आणि परिजात कांबळे असतील या तिघांची निशाणी मशाल आहे माशाल निशाणी समोरच्या बटनाला दाबा आणि या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणा असे जाहीर आवाहन आमदार भास्करराव जाधव यांनी केले.यावेळी जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, तालुकाप्रमुख सचिन बाईत, जयदेव मोरे, स्नेहा वरंडे, तालुका सचिव विलास गुरव यांचे सह सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.















