श्रीरामपूर स्नेहालय कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
श्रीरामपूर | प्रतिनिधी – नंदकुमार बगाडे पाटील
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका व श्रीरामपूर शहरात २६ जानेवारी २०२६ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीरामपूर येथील स्नेहालय कार्यालयात आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाला अहिल्यानगर जिल्हा पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष व आदर्श पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते पुंजाराम मंनचरे (पैठण), यशवंत सर (प्रकल्प व्यवस्थापक) व क्षेत्रीय अधिकारी वामन सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना नंदकुमार बगाडे पाटील म्हणाले की, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान देशाला अर्पण केले. या संविधानामुळे श्रीमंतांपासून गरीबांपर्यंत सर्वांना समान जगण्याचा व मतदानाचा अधिकार मिळाला.”
ते पुढे म्हणाले की, “भारत देशासाठी अनेक महामानव, संत-महात्म्यांनी बलिदान दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणताही जातीभेद न करता बहुजन समाजासाठी महान कार्य केले.”
आजही आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे स्वाभिमानाने जगत आहोत, असे सांगून त्यांनी युवा पिढीला महामानवांचे विचार आचरणात आणण्याचे, आई-वडील व गुरुजनांची सेवा करण्याचे आणि व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात स्नेहालय कार्यालयाचा ध्वजारोहण सुनिता उनवणे (क्षेत्रीय प्रकल्प अधिकारी, श्रीरामपूर) यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला आकाश जावळकर, वैशाली घारे, लता बोंद्रे, सुमित्रा बगाडे, आरती जवळकर, मीराबाई भुसे, माया कांबळे, उषा आडमारे, सुरेखा गुप्ते, लक्ष्मी कांबळे, अनिता पगारे, आशा पवार, रुक्मिणी पाटील, मिरा यादव, लिलाबाई घोडके, विमल घोडके, राजश्री जवळकर, सुरेखाताई तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकल्प समुपदेशक राहुल भोसले यांनी मानले. शेवटी विद्यार्थी-विद्यार्थिनींना खाऊ वाटप करण्यात आले.















