■ गॅसवायुगळती प्रकरणी जयगड विध्यामंदीर महाविद्यालयाची जागा गिळंकृत करण्याचा जिंदाल चा डाव ग्रामस्थांची दबक्या आवाजात चर्चा????..
■ दोन दिवसात ३१ मुलं परकार आणि अन्य हॉस्पिटलमध्ये दाखल
■ शाळेसमोरील पार्किंग हटविण्याची मुख्याध्यापकांची मागणी
■ संस्थेने १ ते ८ प्रश्नांचा खुलासा करावा असे पत्र पालकांनी दिल्याचा मुख्याध्यापकांचा खुलासा
■ समिर शिरवडकर-रत्नागिरी.
रत्नागिरी:- ( जयगड) :– जिंदाल कंपनीच्या हलगर्जीपणमुळे जयगड विध्यमंदिर महाविद्यालयातील मुलांना फटका बसला आहे.पहिल्या दिवशी ६७ मुले ह्या विषारी वायुगळती मुळे त्रस्त झाले आहेत,काल आणि आज अजून ३१ मुलं (आधिचीच १२ मुले) अशी एकूण ३१ मुलं परकार हॉस्पिटल ला आणि अन्य हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याचे कळते.
गॅसवायुगळती प्रकरणी ग्रामस्थांमधुन आत्ता वेगळीच चर्चा ऐकायला मिळत आहे की, जेंव्हा टाकी पासून जवळजवळ तीन किलोमीटर अंतरावर असणारी ही शाळा आहे,परिसरात काही गावे,वाड्या,वस्ती,जिंदाल मध्ये काम करणारे कामगार वसाहत,शाळेसमोरील पार्किंग शेड मधील कर्मचाऱ्यांना हा त्रास झाला नाही, मग फक्त शाळेतील मुलाना आणि शिक्षकांना झाला कसा असा तर्क वितर्क अत्ता जोर धरू लागला आहे.जिंदाल चा एनर्जी प्लान्ट हा काही अंतरावर आहे,आणि शाळेची पाच एकर जागा मोक्याची असलेने ही जागाच गिळंकृत करण्याचा तर डाव नाही ना?अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.परंतू ग्रामस्थ माध्यमासमोर उघड होत नाहीत असे देखील चित्र दिसून आले आहे.
सदर,प्रकरणी अगदीं हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गॅस,आणि इतर वस्तू भेरलेले ट्रक ची पार्किंग हटविण्यासाठी पत्र शाळेच्या मुख्याध्यापकानीं कंपनीकडे आणि जयगड पोलिस ठाणे ला दिल्याचे समजते.त्याचप्रमाणे पालकांनी जयगड शिक्षण प्रसारक मंडळ जयगड १ ते ८ प्रश्नांची उत्तरे किव्हा खुलासा आम्हला दोन दिवसात दिला पाहिजे अश्या आशयाचे पत्र सुद्धा दिले आहे, त्यात १) संस्था आणि पालक यात समन्वय नसल्याने मुलांना शाळेत न पाठविणे,२) पालक,शिक्षक व संस्था यात चर्चा करणे,३) आरोग्य दाखला अनिवार्य,४) पाचवी ते बारावी मुलांचा इन्शुरन्स कंपनीने करावा,५) भविष्यात होणाऱ्या आजाराचा संपूर्ण खर्च कंपनीने करावा,६) हा गॅस प्रकल्प परीसरात नको,अस लेखी कंपनीला आणि प्रशासनाला कळवावे, ७) सर्व विद्यार्थ्यांचे मेडिकल करावे,८) आणि भविष्यात होणाऱ्या अश्या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली,तर संस्था आणि शिक्षक जबाबदारी घेत असल्यास आमच्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास आमची कोणतीही हरकत नाही, अश्या आशयाचे पत्र पालकांनी संस्थेला दिले आहे,या संपूर्ण विषयी शासन आणि संस्था काय निर्णय घेते याकडे पहावे लागेल.
■ हा वायू ड्रोन च्या माध्यमातून शाळेच्या आवारातच सोडला असावा, जेणेकरुन शाळेची जमीन गिळंकृत करता येईल असा सुद्धा जिंदाल चा डाव असू शकतो
जिंदाल कंपनीच्या हलगर्जीपणमुळे जयगड विध्यमंदिर महाविद्यालयातील मुलांना फटका बसला
– गुरुनाथ सुर्वे -माजी सरपंच नांदीवडे.
■ आज आत्ता ३१ मुलं परकार आणि अन्य ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये मध्ये दाखल आहेत
प्रदीप वघोडे- जयगड विध्यमंदिर महाविद्यालय जयगड.
🔴 आमच्या Home पेज ला भेट द्या आणि इतरही बातम्या वाच Click 🔗

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.