नेहरू युवा केंद्र रत्नागिरी मार्फत गुहागर येथे सुशासन दिवस संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नेहरू युवा केंद्र रत्नागिरी मार्फत गुहागर येथे सुशासन दिवस संपन्न

नेहरू युवा केंद्र रत्नागिरी मार्फत गुहागर येथे सुशासन दिवस संपन्न

गुहागर -नेहरू युवा केंद्र रत्नागिरी यांचे वतीने कनिष्ठ महाविद्यालय गुहागर येथे सुशासन दिवस अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे संचालक मनोज पाटील व मान्यवर यांचे शुभ हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमेला पुष्पहार करून करण्यात आले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री मधुकर गंगावणे हे होते.त्यावेळी महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे संचालक मनोज पाटील ,कार्यक्रम समन्वयक नितीन घरत ,सामाजिक कार्यकर्ते , प्रभुनाथ देवळेकर, सुप्रसिद्ध लेखिका व व्याख्यात्या मनाली बावधनकर मॅडम, मेटकरी सर ,पालशेतकर मॅडम, गुरव मॅडम ,बचत गटाच्या अध्यक्षा आरेकर मॅडम, व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.त्यावेळी बोलताना प्राध्यापिका बावधनकर मॅडम म्हणाल्या सुशासनामुळे शासकीय योजनांची परिणामकारकपणे अंमलबजावणी होत असते ,योग्य लाभार्थी पर्यंत पोहोचता येतं, वेळेची बचत होते व राष्ट्राच्या प्रगतीसाठी हातभार लागतो. राष्ट्राच्या प्रगतीसाठी सुशासनाची नितांत आवश्यकता आहे.त्यावेळी पालशेतकर मॅडम ,मनोज पाटील, मधुकर गंगावणे सर यांनी मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन माळी मॅडम यांनी केले.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...