पाथर्डी तालुक्यातील सहा ग्रामसेवकाकडून मुख्यालय राहत असल्या बाबत खोटे ठराव घेऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या वर कारवाई ची मागणी
RTI मध्ये महिती उघड…
शेवगाव– पाथर्डी तालुक्यातील सहा ग्रामसेवकाकडून मुख्यालय राहत असल्या बाबत खोटे ठराव घेऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या ग्रामसेवक वर कारवाई करण्याची मागणी अहिल्यानगर जिल्हा माहिती अधिकार महासंघ चे जिल्हा अध्यक्ष शैलेन्द्र जायभाये यांनी दि..२९ शुक्रवार रोजी मुक्यामंत्री सचिवालय कक्ष, नाशिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
जिल्हा अध्यक्ष जायभाये यांनी मुख्यमंत्रीसाचीवालायाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि, पाथर्डी तालुक्यातील काही ग्रामसेवकांनी मुख्यालय राहत नसतना सुद्धा मुख्यालय राहत असल्याचे ग्रामसेवक यांनी ग्राम सभेचे खोटे ठराव गटविकास अधिकारी प.स.पाथर्डी,यांचेकडे सदर करून शासनाची लाखो रुपयाची फसवणूक केली आहे.
संबधित ग्रामसेवकांनी शासनाची दिशाभूल करून लाखो रुपयांची लुट केली आहे .तसेच मुख्यालय राहत असल्याचे बनावट व दिशाभूल करणारे ठरून अट व शर्ती यांचा भंग केला .यामुळे शासनाचा लाखो रुपयाचा अपहार झाला आहे.संबधित ग्रामसेवक यांची वरिष्ठ कार्यालयामार्फत चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Author: Ratnagiri Vartahar
⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️