आबलोली येथील पत्रकार संदेश तुकाराम कदम “राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार २०२५” या पुरस्काराने सन्मानीत “
“चौथ्या वर्धापन दिनी”, “दिशा महाराष्ट्राची” आयोजित राज्यस्तरीय दुस-या सन्मान सोहळ्यात नवी मुंबई येथे सन्मान
गुहागर (प्रतीनीधी)
गुहागर तालुक्यातील आबलोली गावचे सुपूत्र आणि पत्रकार संदेश तुकाराम कदम यांना “दिशा महाराष्ट्राची” या वेब पोर्टल आणि युटूब चॅनल या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या चौथ्या वर्धापन दिना निमित्त राज्यस्तरीय दुसरा सन्मान सोहळा २०२५ या सन्मान सोहळ्यात ” दिशा महाराष्ट्राची”या संस्थेचे मुख्य संपादक आयु. तुषार गौतम नेवरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच संपादक , साहित्यिक आणि कवी मान.सरकार इंगळी यांचे हस्ते “राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार २०२५” हा पुरस्कार सन्मानपत्र तसेच आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानीत करण्यात आले.याच सन्मान सोहळ्यात “दिशा महाराष्ट्राची” या वेब पोर्टल आणि युटूब चॅनलचे गुहागर तालुका प्रतिनीधी म्हणून पत्रकार संदेश तुकाराम कदम यांना कार्यक्रमाच्या अध्यक्षा व आदर्श प्राचार्य आणि सुप्रसिद्ध निवेदिका मान.अर्चना मोहिते यांचे हस्ते नियुक्ती पत्र आणि ओळखपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले
संदेश तुकाराम कदम आपण गेली अनेक वर्ष आपल्या अंगी असलेल्या कलागुणांनी समाजातील विविध विषयांवर आजतगायत आपण कार्य करत आहात याचा “दिशा महाराष्ट्राची” या वाहिनीस सार्थ अभिमान वाटतो.
आपली आपल्या कामाविषयी असलेली निष्ठा, प्रामाणिकता व तळमळ ही समाजातील अनेक व्यक्तिमत्वांना प्रेरित करणारी आहे.आपली कार्यक्षमता व कर्तव्य दक्षता घेऊन रविवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता भवन सानपाडा, नवी मुंबई येथे आपणास आदरपूर्वक सन्मानीत करत आहोत.आपले अभिनंदन आणि भविष्यकालीन वाटचालीस मंगलमय शुभेच्छा अशा प्रकारचे पुरस्कार सन्मानपत्र आणि आकर्षक ट्रॉफी असा “राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार २०२५” हा पुरस्कार देऊन पत्रकार संदेश तुकाराम कदम यांना सन्मानीत करण्यात आले आहे.यावेळी सुत्रसंचालन सौ.सपना नेवरेकर यांनी केले.
















