सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट

rv ad

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🟣 सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट

महानगरपालिका निवडणुकीनंतर गटनेतेपद पुन्हा किशोरी पेडणेकर यांच्याकडे; ज्येष्ठ नगरसेवक डावलल्याने शिवसैनिकांत अस्वस्थता


मुंबई :
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर ठाकरे गटात अंतर्गत नाराजी उफाळून येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पक्षातील सर्व महत्त्वाची पदे वरळी विधानसभा मतदारसंघातील नेत्यांनाच का दिली जात आहेत, असा थेट सवाल आता नाराज शिवसैनिकांकडून उपस्थित केला जात आहे.

महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे ६५ नगरसेवक निवडून आले असून भाजपनंतर ठाकरे गट हा दुसरा मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, नगरसेवकांची गट नोंदणी करताना माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडेच पुन्हा एकदा गटनेतेपदाची जबाबदारी देण्यात आल्याने पक्षात नाराजीचे वातावरण पसरले आहे.

किशोरी पेडणेकर यांना गटनेतेपद बहाल केल्यावरून पक्षांतर्गत जोरदार कुजबूज सुरू झाली आहे. पक्षातील अनेक ज्येष्ठ व अनुभवी नगरसेवक निवडून आलेले असताना त्यांना डावलण्यात आल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. विशेष म्हणजे कोरोना काळानंतर किशोरी पेडणेकर यांच्यावर विविध आरोप झाले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांना एवढी महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याने अनेक पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत.

तडफदार आणि आक्रमक व्यक्तिमत्त्व म्हणून किशोरी पेडणेकर यांची ओळख असली, तरी मध्यंतरी त्यांच्या उमेदवारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. एबी फॉर्म मिळण्यासाठी त्यांना ताटकळत राहावे लागले होते. प्रभागात नाराजी असतानाही पक्षाने अखेरच्या क्षणी त्यांना उमेदवारी दिली आणि आता निवडणुकीनंतर पुन्हा गटनेतेपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

यंदाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे मिलिंद वैद्य, यशोधर फणसे, विठ्ठल लोकले, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव यांसारखी अनेक मातब्बर मंडळी निवडून आली आहेत. मात्र, या सगळ्यांना डावलून पेडणेकर यांनाच संधी दिल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर अधिक तीव्र होत आहे.

विशेष म्हणजे वरळी विधानसभा मतदारसंघात विधान परिषदेतील दोन आमदार, माजी महापौर, माजी उपमहापौर, बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ माजी नगरसेवकांची मोठी फौज आहे. त्यामुळे ‘शिवसेनेतील सगळी महत्त्वाची पदे वरळीपुरतीच मर्यादित का?’ असा सवाल आता उघडपणे केला जात आहे.

ही वाढती नाराजी उद्धव ठाकरे कशा पद्धतीने हाताळतात आणि पक्षातील असंतोष कसा शांत करतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात