भिमवाडा – सांताक्रुज येथे प्रजासत्ताक दिन साजरा
संदेश कदम (आबलोली)

बौद्धजन पंचायत समिती मुंबई गट क्रमांक 21 यांच्या विद्यमाने भीमवाडा सादर क्रमांक 153 एस. व्ही.रोड सांताक्रुज (पश्चिम) येथे प्रजासत्ताक दिन बौद्धजन पंचायत समिती मुंबई यांच्या वतीने बौद्धजन पंचायत समिती मुंबईचे विश्वस्त आयू. विवेक गोविंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रजासत्ताक दिन गौरव रॅलीचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच तरुण कार्यकर्ते यांनी विशेष सहभाग घेतला त्यामुळेही यशस्वी झाली. भारतीय संविधानामुळे हा भारत देश एकत्र राहिला आहे. देशाचा माजिक समता प्रस्थापित झाली आहे. ती भारतीय संविधानामुळेच आज साऱ्या देशात देशाचे दीपस्तंभ हे संविधान आहे. विषयाची सामाजिक एकता, भौगोलिक एकता, प्रत्येक एकता ही केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आणि त्यांच्या संविधानामुळेच एकता आहे. भारतीय संविधानामुळे आबासाहेबांनी केंद्रीय सत्ता प्रबळ केली आहे जोपर्यंत या जगात चंद्र, सूर्य तारे आहेत. पर्यंत भारतीय संविधान राहणार आहे असे स्पष्ट मत मार्गदर्शन करताना विवेक गोविंदराव पवार यांनी व्यक्त केले.या रॅलीत कार्यकर्ते विजय गंमरे, अक्षय गमरे, संदीप झोरे, महेंद्र जाधव, देवेंद्र सकपाळ, अनंत पवार, राकेश गमरे, सुदेश गमरे, साधना सूरदास, संध्या पवार, सृष्टी पवार, माधुरी मोहिते, वर्षा कदम, सुनिल सूर्यगंध, सिद्धार्थ मोहिते, विलास जाधव, मयूर पवार, शोभा पवार, उन्नती जाधव, राजरत्न पवार, गौरव पवार, आदिल सूरदास, नवनीत जाधव, तुकाराम जाधव, विजय सपकाळ, मदन वर्मा, पद्मिनी घुगे, शशिकला पाईकराव, कावेरी मुळे, द्रोपदी मोरे, कौशल्या मोरे, सुमन अचलखांब, अशोक पवार, संगम मोहिते, नंदा जाधव, आता गायकवाड, रेश्मा कदम, अश्विनी गनत्रा, संध्या जयस्वाल, रजनी कौर, नयनतारा पुजारी, अर्चना मिश्रा, कलावती पांडे, राणी सूरदास, दीपा जाधव, सुनयना पवार, धनंजय कदम, अतीश जाधव, साहिल मोहिते, मनोज जैस्वाल, जयेश जाधव, साहिल मोहिते, स्वॉन मुन्ना स्वामी संख्येने कार्यकर्ते महिला – पुरुष कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.















