महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने महामोर्चाचे आयोजन मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने महामोर्चाचे आयोजन मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन

नवी मुंबई (मंगेश जाधव)

“बौद्ध धम्मियांचे श्रद्धास्थान महाबोधी महाविहाराचे (बोधगया, बिहार) संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या ताब्यात हवे परंतु अधिनियम बी.टी. १९४९ मुळे सदर महाविहार बौद्ध व हिंदू अश्या उभय धर्मियांच्या ताब्यात आहे, जे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १३, १४, १५, २५, २६ चे पूर्णतः उल्लंघन करणारे आहे तसेच अनुचित पद्धतीने बौद्धांच्या धार्मिक हक्कांवर अतिक्रमण करणारे आहे.

हिंदूंच्या मंदिरात हिंदूच पुजारी आणि त्यांचे व्यवस्थापन, ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये ख्रिश्चन फादर आणि त्यांचे व्यवस्थापन, मुसलमानांच्या मस्जिद, दर्ग्यामध्ये मुस्लिम मौलवी आणि त्यांचेच व्यवस्थापन असताना बौद्ध विहारात ब्राम्हणांच अतिक्रमण का ? सरकारने निर्माण केलेला बी. टी. १९४९ हा काळा कायदा रद्द करून महाबोधी महाविहारात ब्राम्हणी कर्मकांडामुळे बुद्धाची जी अवहेलना होते ती थांबावी व आंदोलनासाठी आलेल्या बौद्ध भिख्खू संघावर जो अन्याय होत त्यांची उपेक्षा करीत त्यांना घाणीत बसवले जात आहे हे अन्याय बंद होऊन जागतिक स्तरावर बौद्धांचे श्रद्धास्थान असलेले महाबोधी महाविहार बिहार बौद्ध व्यवस्थापनाच्या ताब्यात दयावे याकरता बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, जयंती उत्सव मंडळ या सर्वांच्या सहकार्याने धडक महामोर्चा सम्राट अशोक यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून राणीची बाग ते आझाद मैदान या मार्गे आगेकूच करीत मंत्रालयावर धडक देणार” अशी सिंहगर्जना सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी ९८ वा चवदार तळे सत्याग्रह महाड क्रांतीदिनी महाड येथे अध्यक्षीय भाषणात केली.

 

अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच पाणी ही देखील माणसाची मूलभुत गरज आहे परंतु तळागाळातील अस्पृश्य, मागासवर्गीय लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी महाड चवदार तळे येथे मोठी क्रांती घडवली होती, अखंड विश्वाच्या इतिहासात प्रथमच पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागला अशी नोंद असलेला भारत हा एकमेव देश आहे, आजमितीस महाड क्रांतीदिनास ९८ वर्षे झाली असून सालाबादप्रमाणे याही वर्षी ९८ वा चवदार तळे सत्याग्रह महाड क्रांतीदिन गुरुवार दिनांक २० मार्च २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजता क्रांतिभुमी महाड येथे सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 

सदर प्रसंगी प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस हारपुष्प अर्पण करून ज्योत प्रज्वलित करण्यात आली. संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार व चिटणीस मनोहर बा. मोरे व सहकाऱ्यांनी अत्यंत सुमधूर वाणीने धार्मिक पूजापाठ संपन्न केला, सदर सभेच्या सुरवातीस भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली समता सैनिक दलांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी नेत्रदीपक परेड संचालन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली, सदर कार्यक्रमास रायगड जिल्ह्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद कृष्णाजी येवले हे प्रमुख पाहुणे म्हणून व उपसभापती विनोद मोरे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते, सदर प्रसंगी महाड तालुका चिटणीस सखाराम जाधव यांनी आपल्या पहाडी आवाजात सूत्रसंचालन केले तर सरचिटणीस राजेश घाडगे यांनी लाघवी शैलीत प्रस्तावना सादर केली तसेच महाड तालुका अध्यक्ष व कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अशोक जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तद्नंतर कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, उपकार्याध्यक्ष एच. आर. पवार, माजी कार्याध्यक्ष व पतसंस्थेचे अध्यक्ष किशोर मोरे, कोषाध्यक्ष नागसेन गमरे, उपसभापती विनोद मोरे आदी मान्यवरांनी शुभेच्छापर आपले विचार व्यक्त करून उपस्थितीतांना मार्गदर्शन केले.

 

आपल्या अध्यक्षीय भाषणात आनंदराज आंबेडकरांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना प्रजासत्ताक भारत देशातील प्रत्येक नागरिकास समान हक्क दिला असताना आजही देशात अनेक अराजारकता माजली आहे, लेकीबळींवर अत्याचार होत आहेत, गरिब व मागासवर्गीयांचे बळी घेतले जातात मात्र सरकार त्याकडे जणू कानाडोळाच करीत आहे, सम्राट अशोकाने भारतात चोऱ्याऐंशी हजार लेण्यांची निर्मिती केली, ठिकठिकाणी विहार बांधली ती गेली कुठं हा प्रश्न उपस्थित झाल्यावर आपल्या लक्षात येईल की त्या सर्व लेणी व विहारांवर सनातनी मनुवाद्यांनी अतिक्रमण करून मूळ बुद्ध स्तूप, मुर्त्या यांना शेंदूर पासून त्यांचे हिंदू देव देवींच्या रुपात रूपांतर करून विहारांवर हिंदू मंदिर बांधून बुद्धाची अवहेलना केली आहे. सद्यस्थितीत बुद्धाचे विचार या देशातून नष्ट करण्यासाठी महाबोधी महाविहारावर अतिक्रमण करून तिथे ही कर्मकांड करण्यात येत आहेत, मागील दोन महिने महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी चाललेले आंदोलन दबावतंत्र वापरून चिरडण्याचे काम सरकार करीत आहे, म्हणून अन्यायी बी.टी. १९४९ अधिनियम बाजूला सारून बौद्धांचे श्रद्धास्थान असलेले महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे” असे प्रतिपादन करीत सर्व बौद्धधर्मियांनी महामोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

  गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत...
Read More
गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा गुहागर | प्रतिनिधी...
Read More
कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!  माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ...
Read More
तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)...
Read More
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

डोंबिवलीत 'लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी'चा थरार; 'तनुजा ११ आबलोली' ठरला महाविजेता! संदेश दादा काताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी भव्य आयोजन...
Read More
डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया...
Read More
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज   केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेले...
Read More
कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत नवीमुंबई (प्रतिनिधी )-गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गावचे सुपुत्र सध्या...
Read More
वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत
Play sound