*वाटद मिरवणे ग्रामपंचायतीचा स्तुत्य निर्णय : अवैध गावठी दारू धंदे बंद करण्यासाठी पुढाकार, पोलिसांची कारवाई सुरू
*
रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे
ग्रामपंचायत वाटद मिरवणे यांनी गावातील अवैध गावठी दारू विक्री व निर्मितीवर कायमस्वरूपी बंदी आणण्यासाठी महिला व ग्रामस्थ यांच्या प्राप्त तक्रारीनुसार महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, सागरी पोलीस ठाणे, जयगड यांना अधिकृत पत्र पाठवून कारवाईची मागणी केली आहे.
गावातील मासिक सभेत या मुद्द्यावर चर्चा होऊन, सरपंच, सदस्य व ग्रामसेवकांनी मिळून ठराव घेतला. त्यानुसार पोलीस निरीक्षकांना पाठवलेल्या पत्रात अवैध दारू व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे आवाहन करण्यात आले.
दारूमुळे होणारे घातक परिणाम:
आरोग्य बिघडते: विषबाधा, यकृत विकार वाढण्याचा धोका.
कुटुंबीयांवर परिणाम: व्यसनामुळे घरगुती वाद, हिंसाचार व ताणतणाव.
गुन्हेगारी वाढते: नशेच्या आहारी गेलेल्यांकडून गुन्हे घडण्याची शक्यता.
शिक्षणाचा बळी: तरुण वर्ग दारूमुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष करतो.
जयगड सहा. पोलीस निरीक्षकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “गावातील अवैध दारू धंद्यांवर कारवाई सुरू आहे.
ग्रामपंचायतीचा हा पुढाकार गावातील आरोग्य, सुरक्षितता आणि सामाजिक सुव्यवस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहे. ही कृती इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.