???? ठाकरे बंधू पुन्हा एकत्र!
वरळी डोमवर आज “विजयी मेळावा”; उद्धव-राज ठाकरे यांची एकत्र तोफ, मराठी अजेंड्यावर ठाम भूमिका
मुंबई, ५ जुलै २०२५ | रत्नागिरी वार्ताहर
राज्यभर आणि दिल्लीपर्यंत चर्चेचा विषय ठरलेला ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा आज वरळी डोम येथे पार पडणार आहे. तब्बल २१ वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र येत आहेत. हिंदी सक्ती विरोधात एकत्र लढा देणाऱ्या या दोघांच्या आवाजात आज सरकारविरोधी आक्रमक टीकेची धग असणार हे निश्चित!
शालेय शिक्षणात हिंदी सक्तीविरोधात घेतलेल्या ठाम भूमिकेने ठाकरे बंधूंनी दोन जीआर रद्द करवून घेण्यात यश मिळवलं. त्या पार्श्वभूमीवर हा मेळावा “विजयी” मानला जात आहे. मात्र या मंचावर कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा, चिन्ह, स्कार्फ नको, फक्त ‘मराठीचा अजेंडा’ हवा, असे स्पष्ट आवाहन राज आणि उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
आज सकाळी ११.३० वाजता ठाकरे बंधू वरळी डोमवर पोहोचतील. यावेळी प्रकाश रेड्डी, जयंत पाटील (शेतकरी पक्ष), सुप्रिया सुळे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे नेते भाषण करणार आहेत. काँग्रेसचे नेते हजर असल्यास त्यांनाही व्यासपीठ मिळेल. शेवटचं भाषण उद्धव ठाकरेंचं असणार आहे.
या मेळाव्यातून ठाकरे बंधू सरकारवर कोणती राजकीय तोफ डागणार? ‘जय गुजरात’ घोषणेवर कशी प्रतिक्रिया येणार? सुशील केडीयांच्या वक्तव्यावर कसा प्रतिउत्तर दिलं जाणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
???? हॅशटॅग्स
#ThackerayBrothers #UddhavThackeray #RajThackeray #VijayiMelava #MumbaiPolitics #MarathiAgenda #MaharashtraPolitics #HindisaktiVirodh #WorliDome #PoliticalUnity #मनसे #शिवसेना #मराठीबाणा
???? फोट















