🚨 साटवली ग्रामपंचायतीचा अनागोदी कारभार उघड; एसटी चालक-वाहकांना धोका!
ग्रामपंचायतीकडून पत्रव्यवहार करून एसटी सेवा सुरू, पण राहण्याच्या व्यवस्थेचा बोजवारा; साप, मोडकळीस आलेली दरवाजे-खिडक्या अजूनही त्याच अवस्थेत .
जितेंद्र चव्हाण | लांजा प्रतिनिधी
लांजा तालुक्यातील साटवली ग्रामपंचायतीचा गोंधळलेला आणि निष्काळजी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. गेल्या ७-८ महिन्यांपासून ‘रुण येते वस्ती’ला वळवलेली लांजा एसटी सेवा अखेर ग्रामस्थांच्या मागणीवरून पुन्हा मंगळवारपासून साटवली येथे सुरू करण्यात आली. ही सेवा पूर्वीपासून साटवलीकरांसाठीच चालू होती, परंतु ग्रामपंचायतीच्या अकार्यक्षमतेमुळे ती दुसरीकडे वळवण्यात आली होती.
ग्रामपंचायतीनेच लांजा आगार व्यवस्थापक श्रीमती काव्या पेडणेकर यांच्याशी पत्रव्यवहार करून गाडी पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने त्यांनी ही गाडी पूर्ववत साटवली गावात आणली.
🛑 पण चालक-वाहकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणी घेणार?
पूर्वी वस्ती गाठणाऱ्या एसटी सेवा बंद होण्यामागे वाहक व चालक राहतात त्या ठिकाणच्या धोकादायक परिस्थितीचा मोठा भाग होता –
राहण्याच्या खोलीत दरवाजे-खिडक्या नव्हत्या
बाथरूममध्ये साप घुसण्याच्या घटना
शटर मोडकळीस आलेले
पाण्याच्या जागी गाळ
हीच कारणे पुढे करत गाडी रुण येते वस्तीवर वळवली गेली होती. ग्रामसभा दरम्यान काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रश्नांची जाब विचारल्यावर काही सुधारणा (जसे की खिडक्या लावणे, शटर दुरुस्ती) करण्यात आल्या. मात्र, बाथरूमला अजूनही खिडक्या नाहीत आणि सर्पदोषाचा धोका कायम आहे.
यामुळे वाहनचालक व वाहक अजूनही धोके पत्करून राहतात, आणि त्यावरून हा प्रश्न उपस्थित होतो की – जर जीवितहानी झाली, तर जबाबदार कोण?
📌जनतेची चर्चा ….
ग्रामपंचायतीकडून एसटी सेवा सुरू करण्यासाठी पत्रव्यवहार करून देखावा केला जातो, पण चालक-वाहकांसाठी आवश्यक निवास व सुरक्षिततेबाबत गंभीर दुर्लक्ष केले जाते. ही बाब केवळ निष्काळजीपणाच नव्हे, तर जाणूनबुजून होणारा अपव्यवस्थेचा नमुना असल्याचे स्पष्ट होते.
—
🔖 #साटवली #लांजा #STसेवा #ग्रामपंचायत #अनागोदीकारभार #सामाजिकसुरक्षा #रस्तेवाहतूक
📸 फोटो
—















