उपकेंद्र नाटे येथे “टीबी मुक्त भारत अभियान” अंतर्गत क्ष-किरण तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
राजापूर ~ पुरुषोत्तम खांबल
“टीबी मुक्त भारत अभियान” अंतर्गत दिनांक 31 जुलै 2025 रोजी नाटे उपकेंद्रात आयोजित करण्यात आलेल्या मोफत क्ष-किरण तपासणी शिबिराला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये नाटे, कशेळी, धाऊलवल्ली व राजवाडी कार्यक्षेत्रातील तब्बल 154 नागरिकांची तपासणी करण्यात आली.
शिबिरात विशेषतः 60 वर्षांवरील नागरिक, मधुमेह (डायबेटीस) रुग्ण, मागील 5 वर्षांतील क्षयरुग्ण आणि त्यांच्या सहवासातील व्यक्ती यांची क्ष-किरण तपासणी करण्यात आली. या तपासणीतून संभाव्य क्षयरुग्ण ओळखून त्यांच्यावर वेळेत उपचार सुरु करण्याचे उद्दिष्ट होते.
या शिबिराचे उद्घाटन नाटे सरपंच श्री. संदीप बांदकर , नौशाद धालवेलकर (उप सरपंच, साखरीनाटे) यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी नाटे पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष चव्हाण, सुनील डूगीलकर, सचिन बांद कर, मजीद गोवळकर , मुख्याध्यापक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात जिल्हा क्षयरोग केंद्राचे पीपीएम समन्वयक श्री. श्रीकांत सावंत, आरोग्य सहायक श्री. मंगेश पाटील, क्ष किरण तंत्रज्ञ श्री. निलेश हंगे, क्षयरोग पर्यवेक्षक श्री. राहुल कोकणे, प्रयोगशाळा पर्यवेक्षक श्रीमती आचल मळेकर यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय ठरली.
या उपक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र धारतळे येथून सुपरवायझर श्री. कुंभार यांनी देखील सहभाग घेतला. तसेच नाटे उपकेंद्राचे श्री. मयूर वानखेडे, कशेळी उपकेंद्राचे श्री. कांबळे, वाडा पेठ उपकेंद्राच्या श्रीमती ममता दुधडे, धाऊल वल्ली उपकेंद्राचे श्री. गेजगे, आरोग्य समुदाय अधिकारी श्री. शरद ढवळे, श्री. धनवे, श्री. सोलणकर, आरोग्य सेवक श्रीमती मुलानी, श्रीमती घवाळी, श्रीमती माधुरी वानखेडे, श्रीमती सायली जाधव, वाहनचालक श्री. सुतार, तसेच गटप्रवर्तक व आरोग्य सेविका यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या शिबिराच्या माध्यमातून क्षयरोगाच्या संभाव्य रुग्णांची लवकर ओळख करून त्यांच्यावर त्वरित उपचाराची प्रक्रिया राबवणे, हा प्रमुख उद्देश होता. शासकीय योजनांचा लाभ खेड्यापाड्यांपर्यंत पोहचवणारा हा उपक्रम खरोखरच ‘टीबी मुक्त भारत’ संकल्पनेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले.