सडवलीत रानडुकरांचा कहर! भातशेतीचे मोठे नुकसान; शेतकरी पुरते हैराण
लांजा तालुक्यातील सडवली गावातील घटनेने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट; वनविभागाकडे रानडुकरांच्या बंदोबस्ताची मागणी तीव्र
लांजा (प्रतिनिधी – जितेंद्र चव्हाण):
लांजा तालुक्यातील सडवली येथे रानडुकरांनी भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून शेतकरी अक्षरशः हैराण झाला आहे. मेहनत घेऊन उभे केलेले पीक आता हाताशी आले असतानाच रानडुकरांनी शेतात घुसून भात शेती अक्षरशः तुडवून टाकली आहे. 
शेतकऱ्यांना आता शिल्लक राहिलेल्या भाताचे निवडक कापणी करावी लागत असून यामुळे त्यांचा वेळ आणि मजुरी दोन्ही खर्ची पडत आहे. रानडुकरांनी पिकाची केलेली नासधूस पाहून शेतकरी शब्दशः हवालदिल झाला आहे.
सदर घटनेनंतर लांजा वनविभाग, ग्राम महसूल अधिकारी आणि कृषी अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे. तसेच सडवली येथील शेतकरी काशिनाथ बापेरकर यांच्या शेतातील भात शेतीचेही रानडुकरांनी मोठे नुकसान केल्याची माहिती मिळाली असून या घटनेचाही पंचनामा करण्यात आला आहे.
सडवली येथील शेतकरी वासुदेव डांगे आणि काशीनाथ बाप रेकर यांच्या शेतीच खूप मोठ नुकसान झाल्याचं समजते.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, “दरवर्षी रानडुकरांच्या उपद्रवामुळे आमचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. पण अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना होत नाहीत.” त्यामुळे वनविभागाने या जंगली रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून तीव्र करण्यात येत आहे.
—
🟩 हॅशटॅग्स:
#लांजा #सडवली #रानडुकरांचा_उपद्रव #भातशेती_नुकसान #शेतकरी_हैराण #RatnagiriNews #KonkanAgriculture #RatnagiriVartahar #साटवली
—
📸















