मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार, सर्वच्या सर्व २२७ जागा लढण्याची तयारी – रमेश चेन्नीथला.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार, सर्वच्या सर्व २२७ जागा लढण्याची तयारी – रमेश चेन्नीथला.

मुंबई महानगरपालिकेवर विजयी झेंडा फडकवणे हेच काँग्रेसचे लक्ष्य, बीएमसीत सत्ताधारी महायुतीचा भ्रष्ट कारभार- खासदार वर्षा गायकवाड

बीएमसी निवडणुकीत आघाडीसाठी समविचारी पक्षांशी काँग्रेस चर्चा करणार.

मुंबई काँग्रेसतर्फे एक दिवसीय ‘लक्ष्य २०२६’ शिबिर मालाडमध्ये संपन्न.

प्रतिनिधि अरविंद कोठारी

मुंबई, दि. १५ नोव्हेंबर २०२५
मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार असून सर्वच्या सर्व २२७ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुंबई महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांना स्पष्ट केले. या निवडणुकीत सर्वांनी एकदिलाने काम करून लोकसभा निवडणुकीसारखा विजय मिळवा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आज मुंबई काँग्रेसतर्फे एक दिवसीय ‘लक्ष्य २०२६’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत करणे व विजयरथ पुढे नेण्याचे उद्दिष्ट या शिबिरातून अधोरेखित झाले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी आमदार रमेश चेन्नीथला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत शिबिराची सुरुवात झाली. कार्यक्रमाला AICC सचिव व मुंबई प्रभारी यु. बी. व्यंकटेश, मुंबई काँग्रेस अध्यक्षा व खासदार प्रा. वर्षाताई एकनाथ गायकवाड, सहप्रभारी रियाज रेहाना, बी. एम. संदीप, राष्ट्रीय सचिव व तेलंगणा सहप्रभारी सचिन सावंत, विधीमंडळ उपनेते आमदार अमिन पटेल, आमदार भाई जगताप, आमदार अस्लम शेख, आमदार डॉ. ज्योती गायकवाड तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाशी तरुणवर्ग तसेच नवीन लोकांना जोडले पाहिजे. बुथ स्थरापर्यंत काम केले पाहिजे. काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवण्याचे काम करा. पक्षाने ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम केले पाहिजे. पदे ही शोभा वाढवण्यासाठी दिलेली नाहीत, जे काम करणार नाहीत त्यांना पदमुक्त केले जाईल असा इशारा चेन्नीथला यांनी यावेळी दिला.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड यावेळी म्हणाल्या की, तीन वर्षापासून बीएमसीमध्ये लोकप्रतिनिधी नाहीत, या काळात महानगरपालिकेत भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे. कोट्यवधी रुपये लुटले आहेत. सहा हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवी खर्च केल्या आहेत. मुंबईतील महत्वाच्या जागा काही खास लोकांना कवडीमोल भावाने दिल्या जात आहेत. काँग्रेसने बीएमसी मधील भ्रष्टाचाराची एक एक प्रकरणे चव्हाट्यावर आणलेली आहेत. आगामी काळातही भाजपा महायुतीचा भ्रष्टाचार बाहेर काढला जाईल. काँग्रेस पक्ष मुंबईकरांचा आवाज बनून मुंबईतील पाणी, वाहतूक समस्या, भ्रष्टाचार, रस्त्यावरील खड्डे, प्रदुषण यावर आवाज उठवत आहे. विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना निधी दिला जात नाही पण मुंबई महापालिकेचा निधी पार्टी फंड असल्यासारख्या महायुती त्यांच्या पक्षातील लोकांना वाटत आहे.

खा. गायकवाड पुढे म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिका निवडणुकीत समविचारी छोट्या पक्षांना सोबत घेऊन लढवण्याचा आमचा विचार असून मुंबईतील सर्वच्या सर्व २२७ जागा लढण्याची तयारी आहे. निवडणुका दोन महिन्यावर आल्या तरी निवडणूक आयागाने अद्याप पुरवणी मतदार यादी दिलेली नाही. मतदान आठ दिवस असताना मतदार यादी येते मग यावर काम कधी करायचे. या याद्यांमध्ये घोळ केला जातो. काँग्रेस कार्यकर्त्यांनी डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे. मतदार याद्या तपासा, बुथ लेवलवर जाऊन काम करा आणि पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याला निवडून आण्यासाठी काम करा, असे आवाहन त्यांनी केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की, आपल्यासमोर मोठे आव्हान असले तरी डगमगून जाता कामा नये. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता पराभवाने खचून जात नाही, आता रडायचे नाही तर लढायचे आहे हे लक्षात ठेवा, आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकच लक्ष्य ठेवा आणि विजय मिळवण्यासाठी काम करा, असे आवाहन करताना त्यांनी भाजपा व आरएसएसवर तुफान हल्ला केला. आपली लढाई ही शुद्ध विचाराची आहे. भाजपा व आरएसएसच्या स्वप्नातील भारत व आपल्या स्वप्नातील भारत वेगळा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना धर्म सोडायला लावणारे हेच मनुवादी विचाराचे लोक होते, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

मुंबई काँग्रेसचे सहप्रभारी यु. बी. व्यंकटेश यावेळी म्हणाले की, ही निवडणूक सत्य आणि असत्य, नीतिमत्ता आणि अधर्म यांच्यातील लढाई आहे. या आव्हानाला तोंड देण्यास काँग्रेस पक्ष सक्षम आहे. मुंबईतील सर्व २२७ जागा लढवण्याची क्षमता काँग्रेसमध्ये आहे.

आमदार भाई जगताप यावेळी म्हणाले की, महानगरपालिकेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची तयारी असेल तर त्यांच्या पाठीशी पक्षाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. २२७ उमेदवार उभे करण्याची क्षमता काँग्रेस पक्षात आहे याचा अर्थ प्रत्येक वार्डात काँग्रेस पक्षाची ताकद आहे, असे भाई जगताप म्हणाले.

आरपीआयचे राजेंद्र गवईही या शिबिराला उपस्थित होते. तर शिबिराच्या दुपारच्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, निरंजन टकले, अशोक वानखेडे, राम पुनियानी मार्गदर्शन केले, तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

  गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत...
Read More
गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा गुहागर | प्रतिनिधी...
Read More
कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!  माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ...
Read More
तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)...
Read More
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

डोंबिवलीत 'लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी'चा थरार; 'तनुजा ११ आबलोली' ठरला महाविजेता! संदेश दादा काताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी भव्य आयोजन...
Read More
डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया...
Read More
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज   केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेले...
Read More
कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत नवीमुंबई (प्रतिनिधी )-गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गावचे सुपुत्र सध्या...
Read More
वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत
Play sound