मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार, सर्वच्या सर्व २२७ जागा लढण्याची तयारी – रमेश चेन्नीथला.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार, सर्वच्या सर्व २२७ जागा लढण्याची तयारी – रमेश चेन्नीथला.

मुंबई महानगरपालिकेवर विजयी झेंडा फडकवणे हेच काँग्रेसचे लक्ष्य, बीएमसीत सत्ताधारी महायुतीचा भ्रष्ट कारभार- खासदार वर्षा गायकवाड

बीएमसी निवडणुकीत आघाडीसाठी समविचारी पक्षांशी काँग्रेस चर्चा करणार.

मुंबई काँग्रेसतर्फे एक दिवसीय ‘लक्ष्य २०२६’ शिबिर मालाडमध्ये संपन्न.

प्रतिनिधि अरविंद कोठारी

मुंबई, दि. १५ नोव्हेंबर २०२५
मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार असून सर्वच्या सर्व २२७ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुंबई महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांना स्पष्ट केले. या निवडणुकीत सर्वांनी एकदिलाने काम करून लोकसभा निवडणुकीसारखा विजय मिळवा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आज मुंबई काँग्रेसतर्फे एक दिवसीय ‘लक्ष्य २०२६’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत करणे व विजयरथ पुढे नेण्याचे उद्दिष्ट या शिबिरातून अधोरेखित झाले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी आमदार रमेश चेन्नीथला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत शिबिराची सुरुवात झाली. कार्यक्रमाला AICC सचिव व मुंबई प्रभारी यु. बी. व्यंकटेश, मुंबई काँग्रेस अध्यक्षा व खासदार प्रा. वर्षाताई एकनाथ गायकवाड, सहप्रभारी रियाज रेहाना, बी. एम. संदीप, राष्ट्रीय सचिव व तेलंगणा सहप्रभारी सचिन सावंत, विधीमंडळ उपनेते आमदार अमिन पटेल, आमदार भाई जगताप, आमदार अस्लम शेख, आमदार डॉ. ज्योती गायकवाड तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाशी तरुणवर्ग तसेच नवीन लोकांना जोडले पाहिजे. बुथ स्थरापर्यंत काम केले पाहिजे. काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवण्याचे काम करा. पक्षाने ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम केले पाहिजे. पदे ही शोभा वाढवण्यासाठी दिलेली नाहीत, जे काम करणार नाहीत त्यांना पदमुक्त केले जाईल असा इशारा चेन्नीथला यांनी यावेळी दिला.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड यावेळी म्हणाल्या की, तीन वर्षापासून बीएमसीमध्ये लोकप्रतिनिधी नाहीत, या काळात महानगरपालिकेत भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे. कोट्यवधी रुपये लुटले आहेत. सहा हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवी खर्च केल्या आहेत. मुंबईतील महत्वाच्या जागा काही खास लोकांना कवडीमोल भावाने दिल्या जात आहेत. काँग्रेसने बीएमसी मधील भ्रष्टाचाराची एक एक प्रकरणे चव्हाट्यावर आणलेली आहेत. आगामी काळातही भाजपा महायुतीचा भ्रष्टाचार बाहेर काढला जाईल. काँग्रेस पक्ष मुंबईकरांचा आवाज बनून मुंबईतील पाणी, वाहतूक समस्या, भ्रष्टाचार, रस्त्यावरील खड्डे, प्रदुषण यावर आवाज उठवत आहे. विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना निधी दिला जात नाही पण मुंबई महापालिकेचा निधी पार्टी फंड असल्यासारख्या महायुती त्यांच्या पक्षातील लोकांना वाटत आहे.

खा. गायकवाड पुढे म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिका निवडणुकीत समविचारी छोट्या पक्षांना सोबत घेऊन लढवण्याचा आमचा विचार असून मुंबईतील सर्वच्या सर्व २२७ जागा लढण्याची तयारी आहे. निवडणुका दोन महिन्यावर आल्या तरी निवडणूक आयागाने अद्याप पुरवणी मतदार यादी दिलेली नाही. मतदान आठ दिवस असताना मतदार यादी येते मग यावर काम कधी करायचे. या याद्यांमध्ये घोळ केला जातो. काँग्रेस कार्यकर्त्यांनी डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे. मतदार याद्या तपासा, बुथ लेवलवर जाऊन काम करा आणि पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याला निवडून आण्यासाठी काम करा, असे आवाहन त्यांनी केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की, आपल्यासमोर मोठे आव्हान असले तरी डगमगून जाता कामा नये. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता पराभवाने खचून जात नाही, आता रडायचे नाही तर लढायचे आहे हे लक्षात ठेवा, आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकच लक्ष्य ठेवा आणि विजय मिळवण्यासाठी काम करा, असे आवाहन करताना त्यांनी भाजपा व आरएसएसवर तुफान हल्ला केला. आपली लढाई ही शुद्ध विचाराची आहे. भाजपा व आरएसएसच्या स्वप्नातील भारत व आपल्या स्वप्नातील भारत वेगळा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना धर्म सोडायला लावणारे हेच मनुवादी विचाराचे लोक होते, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

मुंबई काँग्रेसचे सहप्रभारी यु. बी. व्यंकटेश यावेळी म्हणाले की, ही निवडणूक सत्य आणि असत्य, नीतिमत्ता आणि अधर्म यांच्यातील लढाई आहे. या आव्हानाला तोंड देण्यास काँग्रेस पक्ष सक्षम आहे. मुंबईतील सर्व २२७ जागा लढवण्याची क्षमता काँग्रेसमध्ये आहे.

आमदार भाई जगताप यावेळी म्हणाले की, महानगरपालिकेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची तयारी असेल तर त्यांच्या पाठीशी पक्षाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. २२७ उमेदवार उभे करण्याची क्षमता काँग्रेस पक्षात आहे याचा अर्थ प्रत्येक वार्डात काँग्रेस पक्षाची ताकद आहे, असे भाई जगताप म्हणाले.

आरपीआयचे राजेंद्र गवईही या शिबिराला उपस्थित होते. तर शिबिराच्या दुपारच्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, निरंजन टकले, अशोक वानखेडे, राम पुनियानी मार्गदर्शन केले, तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत मोठी...
Read More
जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका

गुढीपाडवा मेळावा २०२६: 'महाराष्ट्र धर्मा'साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका मुंबई: प्रतिनिधी मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाच्या...
Read More
गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका

रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार

रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार ठळक मुद्दे: * लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी...
Read More
रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार