कारखान्यांची धुराडी पेटली, पण दराचं काय? ~ अतुल नाना मानेपाटील संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कारखान्यांची धुराडी पेटली, पण दराचं काय?

~ अतुल नाना मानेपाटील

संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ

 

अहिल्यानगर, जिल्हा प्रतिनिधी – नंदकुमार बगाडे पाटील

राज्यातील साखर कारखाने सुरु होऊन जवळपास महिनाभर झाला असतानाही सोलापूर जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखानदारांनी अद्याप उसाचा दर जाहीर केलेला नाही. कारखान्यांच्या धुराड्या धगधगत आहेत, उसाला कोयते चालले आहेत; पण शेतकऱ्याच्या मेहनतीचा दर मात्र अजूनही हवेतच आहे.

 

सोलापूर जिल्ह्यात तब्बल ३९ साखर कारखाने आहेत. यापैकी प्रा. शिवाजीराव सावंत सरांचा राजवी अॅग्रो शुगर कारखाना हा अपवाद ठरला असून त्यांनी उसाचा दर ३००१ रुपये प्रति टन जाहीर केला आहे. मात्र उर्वरित एकाही कारखान्याने दर जाहीर करण्याचा धाडस केलेले नाही. दराबाबत शेतकऱ्यांकडून ३५०० रुपयांची मागणी होत असताना कारखान्यांनी मात्र हातावर हात ठेवून गप्पी साधली आहे.

 

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आधीच अतिवृष्टी आणि पुरामुळे गंभीर संकटात सापडले आहेत. कुणाची पिके वाहून गेली, कुणाची जमीनच नुसती उध्वस्त झाली. जे थोडेफार पिक उरले आहे त्यातही शंभर अडचणी. अशा वेळी दर न जाहीर करता कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केल्याने शेतकऱ्यांच्या उसाला कोयते तर चालले, पण मनात मात्र दराबाबत काळोखच आहे.

 

याउलट कोल्हापूर, सातारा, सांगली या भागातील साखर कारखानदारांनी उसाचे दर जाहीर केले आहेत. या जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी ३५०० ते ३६०० रुपये इतके दर ठरवले आहेत. मग सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना दर जाहीर करण्यात नेमकी अडचण काय, असा प्रश्न शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.

 

या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांना विचारणा झाली असता त्यांनी स्पष्ट सांगितले की,

 

> “कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी उसाच्या दरासाठी एकजुटीने उभे राहतात. त्यामुळे तेथील कारखानदारांना नमतं घ्यावंच लागतं. पण सोलापूर जिल्ह्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांची अशी एकजूट नाही. म्हणूनच तेथील कारखानदार चांगला दर देत नाहीत, याचा फटका थेट शेतकऱ्यांनाच बसतो.”

खरं तर साखर कारखाने ही शेतकऱ्यांची नव्हे तर कारखानदारांची “सोन्याचं अंड देणारी कोंबडी” मानली जाते. कारण, कारखान्यातून केवळ साखरच विकली जात नाही, तर

वीज निर्मिती,इथेनॉल,मोलॅसिस,मळी,भुसा

अशी अनेक उत्पादने विक्रीला जातात आणि त्यातून प्रचंड महसूल कारखानदारांच्या हाती जमा होतो. मग असे असताना सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना कोल्हापूर–सांगलीप्रमाणे दर देण्यास नेमकी अडचण काय, असा सवाल निर्माण होतो.

पश्चिम महाराष्ट्रात ऊस हेच महत्वाचं पीक. ऊस शेतीवर हजारो कुटुंबांचा प्रपंच उभा आहे. या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील ऊस अतिवृष्टी आणि पुरामुळे आधीच उद्ध्वस्त झाला. एका बाजूला आस्मानी संकट, आणि दुसऱ्या बाजूला दर न जाहीर केल्याने सुलतानी संकट – अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे. कारखानदार मात्र शांतपणे धुराड्या पेटवून शेतकऱ्यांची “मजा” बघतायत, अशी भावना ऊस उत्पादकांत तीव्र होत आहे.

 

अशा परिस्थितीत आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकजूट दाखवण्याची वेळ आल्याचे मत व्यक्त होत आहे.

कारखानदारांना जाब विचारणे,

आपल्या हक्काचा योग्य दर मागणे,

आणि राजकारण बाजूला ठेवून एकत्र उभे राहणे,

यातूनच शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पडू शकतील; अन्यथा कारखानदार कमी दरात शेतकऱ्यांना गुंडाळतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पडद्यामागे बहुतांश कारखानदार एकाच सूत्रावर चालतात आणि “ठरलेल्या रेषेपलीकडे दर वाढवायचा नाही” असा मौन करार करूनच कारखाने सुरू केले जातात, असा आरोपही होत आहे.

कारखान्यांची धुराडी पेटली, पण उसाच्या दराचे काय? हा सवाल विचारत ऊस उत्पादकांनी एकजूट होऊन लढा उभारण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा गुहागर | प्रतिनिधी...
Read More
कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!  माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ...
Read More
तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)...
Read More
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

डोंबिवलीत 'लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी'चा थरार; 'तनुजा ११ आबलोली' ठरला महाविजेता! संदेश दादा काताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी भव्य आयोजन...
Read More
डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया...
Read More
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज   केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेले...
Read More
कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत नवीमुंबई (प्रतिनिधी )-गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गावचे सुपुत्र सध्या...
Read More
वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या जिल्हा महिला विभाग सचिवपदी पत्रकार किरणताई वाघ यांची निवड

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या जिल्हा महिला विभाग सचिवपदी पत्रकार किरणताई वाघ यांची निवड   देऊळगाव राजा : भारत सरकार नोंदणीकृत...
Read More
ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या जिल्हा महिला विभाग सचिवपदी पत्रकार किरणताई वाघ यांची निवड
Play sound