“शिव प्रभा”या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष आनंद शिवराम जाधव “राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानीत”
आबलोली (संदेश कदम)
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि भरीव कामगीरी करुन गेली अनेक वर्ष ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थांचा शैक्षणिक आणि सामाजिक विकास व्हावा यासाठी सामाजिक कार्याचा ध्यास घेतलेले आणि वडील दिवंगत शिवराम पांडूरंग जाधव,आई दिवंगत प्रभावती शिवराम जाधव या आई – वडिलांनी दिलेल्या समाजसेवेचा वसा घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक कार्यात स्वत: ला झोकून देऊन निस्वार्थ पणे तन मन धन अर्पण करणारे गुहागर तालुक्यातील कुडली गावचे सुपूत्र आणि “शिव प्रभा”या सामाजिक संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष आनंद शिवराम जाधव यांना ” राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२५” या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
“राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२५ हा पुरस्कार वेब पोर्टल आणि युटूब चॅनलच्या” ,”दिशा महाराष्ट्राची” या संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिना निमित्त दुसरे कवी संमेलन आणि राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात आनंद शिवराम जाधव यांना दिशा महाराष्ट्राची या संस्थेचे मुख्य संपादक तुषार गौतम नेवरेकर, कर्नाटक येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ.रोहिणी दिक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत संपादक, साहित्यिक आणि कवी सरकार इंगळी यांच्या हस्ते “राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२५ ” या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
कवी संमेलन आणि पुरस्कार सोहळा कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता भवन सानपाडा, जुईनगर स्टेशन जवळ नवी मुंबई येथे आदर्श प्राचार्य आणि सुप्रसिद्ध निवेदिका अर्चना मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार सन्मान सोहळा उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला.यावेळी विवीध स्तरातील दिग्गज मंडळी उपस्थित होती.या संपूर्ण कार्यक्रमाचे निटनेटके नियोजन दिशा महाराष्ट्राची या संस्थेचे मुख्य संपादक तुषार गौतम नेवरेकर, सौ.सपना तुषार नेवरेकर यांनी केले होते















