गुहागर तालुक्यातील बौद्ध समाज अस्तित्वासाठी एकवटला

आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील बौद्ध संघटना विश्वरत्न ,विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धार्मिक, सामाजिक आणि चळवळीमध्ये आपापल्या परीने कार्यरत होता. परंतु आता गट, तट आणि राजकीय पक्ष बाजूला ठेवून बौद्धांचे एकच संघटन व्हावे हा उदात्त हेतू घेऊन आपली भावी पिढी ही आदर्शवत घडावी आणि संघटित रहावी, बौद्धांवरील अन्याय, अत्याचार यांना एकत्रितपणे लढा देण्यासाठीच गुहागर तालुक्यातील बौद्ध समाज आपले राजकीय पक्ष बाजूला ठेवून संघटित झाला आहे. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात एकीचे दर्शन घडवून दिले आहे. गुहागर तालुक्यातील हा ऐतिहासिक निर्णय बौद्ध समाजाच्या भावी पिढीसाठी मार्गदर्शक आणि तारणहार ठरणार आहे. हे ऐक्य बौद्ध समाजाचे अस्तित्व टिकवणारे असून बौद्ध समाज बांधवांनी या ऐक्यात संघटित राहण्याचा निर्धार केला आहे. लवकरच गुहागर तालुका बौद्ध समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात गुहागर तालुका बौद्ध समन्वय समिती यांच्या वतीने सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी एस. एल. सुर्वे हे होते. मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना आणि पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली व जाहीर सभेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी आप्पा कदम, सिद्धार्थ जाधव, विजय असगोलकर, सुनील जाधव, उज्वल पवार, संदीप पवार यांनी आपले विचार मांडले शेवटी अध्यक्ष भाषणात एस. एल .सुर्वे यांनी बौद्धांचे अस्तित्व टिकवणारे आपण सगळ्यांनी केले पाहिजे असे सांगून मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी गुहागर तालुका बौद्ध समन्वय समिती स्थापन करण्याची भूमिका मांडण्यात आली. या समाज बांधवांनी पाठिंबा दिला.
यावेळी विचार पिठावर आप्पा कदम, सिद्धार्थ जाधव, एस. एल. सुर्वे, सुनील जाधव, विजय असगोलकर, काशिनाथ सुर्वे, महेंद्र आप्पा कदम, भीमसेन सावंत आदि. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गुहागर तालुक्यातून संदीप कदम, सुनील गमरे, शंकर मोहिते, विजय पवार, दिलीप सावंत, जितेंद्र कदम, महेंद्र कदम, संजय सावंत, चंद्रकांत मोहिते, सुनील सुर्वे, नितीन सुर्वे, चंद्रकांत पवार, विलास पवार, दिलीप सुर्वे, दशरथ पवार,एकनाथ सुर्वे ,अजित सुर्वे, विष्णू सावंत, प्रभाकर सुर्वे, सुधीर जाधव, सुगंध मोहिते ,नारायण मोहिते ,संदीप मोहिते,अनिल मोहिते, सूर्यकांत जाधव, संदीप जाधव, राजेश पवार,रामचंद्र पवार, संदीप सुर्वे, आकाश कदम, यशवंत पवार, विनायक पवार, संदीप जाधव, प्रवीण जाधव, यशवंत जाधव,प्रजन पवार, अशोक यादव,यशवंत जाधव, धर्मानंद यादव सखाराम पवार, बाळकृष्ण जाधव,मिलिंद पवार, दत्ताराम कदम, विलास कांबळे, मयूर गमरे ,अविनाश गमरे ,राकेश गमरे, संजय कदम, दिलीप कदम, सचिन पवार, शशिकांत सुर्वे ,बी .के .सुर्वे, राजाराम जाधव, विनोद पवार, विलास कांबळे, बाळकृष्ण पवार, संदीप पवार ,वैभव पवार, सागर पवार, अरुण सुर्वे, प्रशांत कदम ,उज्वल पवार, सुदेश हडकर, सुदेश कांबळे, भूषण पवार, करण सावंत, शांताराम कदम आदी.बौद्ध बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल सावंत यांनी केले तर सुनील जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.















