सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट

rv ad

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🟣 सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट

महानगरपालिका निवडणुकीनंतर गटनेतेपद पुन्हा किशोरी पेडणेकर यांच्याकडे; ज्येष्ठ नगरसेवक डावलल्याने शिवसैनिकांत अस्वस्थता


मुंबई :
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर ठाकरे गटात अंतर्गत नाराजी उफाळून येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पक्षातील सर्व महत्त्वाची पदे वरळी विधानसभा मतदारसंघातील नेत्यांनाच का दिली जात आहेत, असा थेट सवाल आता नाराज शिवसैनिकांकडून उपस्थित केला जात आहे.

महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे ६५ नगरसेवक निवडून आले असून भाजपनंतर ठाकरे गट हा दुसरा मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, नगरसेवकांची गट नोंदणी करताना माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडेच पुन्हा एकदा गटनेतेपदाची जबाबदारी देण्यात आल्याने पक्षात नाराजीचे वातावरण पसरले आहे.

किशोरी पेडणेकर यांना गटनेतेपद बहाल केल्यावरून पक्षांतर्गत जोरदार कुजबूज सुरू झाली आहे. पक्षातील अनेक ज्येष्ठ व अनुभवी नगरसेवक निवडून आलेले असताना त्यांना डावलण्यात आल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. विशेष म्हणजे कोरोना काळानंतर किशोरी पेडणेकर यांच्यावर विविध आरोप झाले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांना एवढी महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याने अनेक पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत.

तडफदार आणि आक्रमक व्यक्तिमत्त्व म्हणून किशोरी पेडणेकर यांची ओळख असली, तरी मध्यंतरी त्यांच्या उमेदवारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. एबी फॉर्म मिळण्यासाठी त्यांना ताटकळत राहावे लागले होते. प्रभागात नाराजी असतानाही पक्षाने अखेरच्या क्षणी त्यांना उमेदवारी दिली आणि आता निवडणुकीनंतर पुन्हा गटनेतेपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

यंदाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे मिलिंद वैद्य, यशोधर फणसे, विठ्ठल लोकले, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव यांसारखी अनेक मातब्बर मंडळी निवडून आली आहेत. मात्र, या सगळ्यांना डावलून पेडणेकर यांनाच संधी दिल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर अधिक तीव्र होत आहे.

विशेष म्हणजे वरळी विधानसभा मतदारसंघात विधान परिषदेतील दोन आमदार, माजी महापौर, माजी उपमहापौर, बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ माजी नगरसेवकांची मोठी फौज आहे. त्यामुळे ‘शिवसेनेतील सगळी महत्त्वाची पदे वरळीपुरतीच मर्यादित का?’ असा सवाल आता उघडपणे केला जात आहे.

ही वाढती नाराजी उद्धव ठाकरे कशा पद्धतीने हाताळतात आणि पक्षातील असंतोष कसा शांत करतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा गुहागर | प्रतिनिधी...
Read More
कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!  माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ...
Read More
तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)...
Read More
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

डोंबिवलीत 'लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी'चा थरार; 'तनुजा ११ आबलोली' ठरला महाविजेता! संदेश दादा काताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी भव्य आयोजन...
Read More
डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया...
Read More
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज   केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेले...
Read More
कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत नवीमुंबई (प्रतिनिधी )-गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गावचे सुपुत्र सध्या...
Read More
वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या जिल्हा महिला विभाग सचिवपदी पत्रकार किरणताई वाघ यांची निवड

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या जिल्हा महिला विभाग सचिवपदी पत्रकार किरणताई वाघ यांची निवड   देऊळगाव राजा : भारत सरकार नोंदणीकृत...
Read More
ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या जिल्हा महिला विभाग सचिवपदी पत्रकार किरणताई वाघ यांची निवड
Play sound