सागर तट स्वच्छतादिन: भारतीय तटरक्षक दलाने भाट्ये किनाऱ्यावर जमा केला ४५० किलो कचरा..

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सागर तट स्वच्छतादिन: भारतीय तटरक्षक दलाने भाट्ये किनाऱ्यावर जमा केला ४५० किलो कचरा.….

सागर तट स्वच्छतादिन: भारतीय तटरक्षक दलाने भाट्ये किनाऱ्यावर जमा केला ४५० किलो कचरा

)भारतीय तटरक्षक दल रत्नागिरीने आंतरराष्ट्रीय सागर तट स्वच्छता दिनानिमित्त शहराजवळील भाट्ये बीचवर आज (२१ सप्टेंबर) सकाळी या स्वच्छ्ता मोहिमेचे आयोजन केले होते. दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या तिस-या शनिवारी आंतरराष्ट्रीय सागर तट स्वच्छता दिन जगभर साजरा केला जातो

दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या तिस-या शनिवारी आंतरराष्ट्रीय सागर तट स्वच्छता दिन जगभर साजरा केला जातो. याद्वारे वनस्पती आणि प्राणी यांचे संरक्षण करण्यासाठी आणि सागरी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी स्वच्छ समुद्रकिनारे आणि समुद्र किनाऱ्यांबद्दल जागरूकता पसरवली जाते. यावर्षी, भारतीय तटरक्षक दल रत्नागिरीने आंतरराष्ट्रीय सागर तट स्वच्छता दिनानिमित्त शहराजवळील भाट्ये बीचवर आज (२१ सप्टेंबर) सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत स्वच्छ्ता मोहिमेचे आयोजन केले.

यावेळी मत्स्यव्यवसाय विभाग, सागरी पोलीस, कस्टम्स, एनसीसी कॅडेट्स, इक्रा इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या एनएसएस सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. स्वच्छ आणि सुरक्षित समुद्रासाठी सहभागींमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता वाढवणे हा या मोहिमेचा उद्देश होता. 

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

Leave a Comment

आणखी वाचा...