अंधेरी पूर्व येथील नालंदा बुद्ध विहारात “महिला परिवर्तन” संकल्पाची ५ वी मालिका उत्साहात संपन्न..!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अंधेरी पूर्व येथील नालंदा बुद्ध विहारात “महिला परिवर्तन” संकल्पाची ५ वी मालिका उत्साहात संपन्न..!

आम्रपाली महिला मंडळ आणि बौध्दजन पंचायत समिती यांचा स्तुत्य उपक्रम..!

आबलोली (संदेश कदम) …

मुंबई – अंधेरी पूर्व, सहार व्हिलेज येथे नालंदा बुद्ध विहारात आम्रपाली महिला मंडळ आणि बौद्धजन पंचायत समिती, शाखा क्र.१६० यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे या वर्षीहि महिला परिवर्तन संकल्प हा उपक्रम सतत नऊ दिवस राबविण्यात येत आहे. यंदा महिला आणि तरूणींनी आपल्या बौद्ध धम्माबद्दल व इतर सामाजिक विषय थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी या उपक्रमातचे पाचवे पुष्प गुंफताना प्रमुख वक्त्या पत्रकार कु. मेघना सुर्वे यांनी “बौद्ध महिलांनी धम्म समजून घेणे ही काळाची गरज” या विषयावर उपस्थित महिलांना मौलिक मार्गदर्शन केले. हा संपूर्ण कार्यक्रम विजया पवार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा जाधव यांनी केले. तर विद्या कासारे, सोनल कळंबे यांचे या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. यावेळी साधना कळंबे, मनिषा नारायण जाधव, नंदा गायकवाड, भारती जाधव तसेच शाखेचे अध्यक्ष संजय जाधव, सुभाष जाधव, चंद्रकांत गायकवाड, चंद्रकांत सावंत, स्वप्नील कळंबे, सागर गायकवाड, सागर कांबळे व शाखेतील इतर महिला – पुरुष सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.शेवटी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या उपस्थतांना अल्पोआहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

Leave a Comment

आणखी वाचा...