विद्यमान आमदारांच्या अर्जाचा मुहूर्त ठरला भास्कर जाधव २४ ला भरणार उमेदवारी अर्ज
शृगारतळी.(मयुरेश भागवत)…
विधानसभा समर्थकांची जोरदार तयारी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २२ पासून सुरु होत आहे..
महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप किवा उमेदवार जाहीर झालेले नसले तरीही उमेदवारी मिळणार हे निश्चित असलेल्यांनी अर्ज भरण्याचा मुहूर्त काढण्यास सुरुवात केली आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी शक्ती प्रदर्शासह २४ ला उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त काढला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे ३० दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे इच्छुकांनी प्रचार यंत्रणा तळागाळात पोहोचविण्यास सुरुवात केली आहे. तसेच अर्ज भरण्याचा मुहूर्त काढला आहे.
गुहागर विधानसभेचे आमदार भास्कर जाधव हे २४ ऑक्टोबरला सकाळी १०.३० वाजता शिवाजी चौक गुहागर येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून शक्ती प्रदर्शनासह रॅली काढणार आहेत. तसेच तहसीलदार कार्यालयाजवळ निवडणूक आयोगाच्या दालनात अर्ज दाखल करणार आहेत.
तत्पूर्वी श्रृंगारतळी बाजारपेठेमध्ये सकाळी १०.०० वाजता त्यांचे येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत होणार आहे. रत्नागिरी विधानसभेचे आमदार तथा पालकमंत्री उदय सामंत हे 24 ऑक्टोबरला अर्ज भरण्याची शक्यता आहे. राजापूर – लांजा मधून शिंदे शिवसेनेतर्फे किरण सामंत २४ रोजी अर्ज भरण्याची शक्यता आहे.
Plz Join whatsup group ????https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv















