मनसे तर्फे उद्या गुहागर मधून भरणार उमेदवारी अर्ज….गुहागर तालुक्याचा विकासात्मक कायापालट करण्यासाठीच मनसे निवडणूक रिंगणात – प्रमोद गांधी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 मनसे तर्फे उद्या गुहागर मधून भरणार उमेदवारी अर्ज….गुहागर तालुक्याचा विकासात्मक कायापालट करण्यासाठीच मनसे निवडणूक रिंगणात – प्रमोद गांधी

बेरोजगारीचा प्रश्न केंद्रस्थानी, विकासात अजूनही मतदारसंघ मागेच

आबलोली (संदेश कदम)

गुहागर विधानसभा मतदारसंघात विकासाची कामे आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांनी केलेली नाहीत. आरोग्य, शिक्षण याबरोबरच बेरोजगारीचा प्रश्न आजही गंभीर आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळणेही कठीण झाले आहे. केवळ पाखाड्या, रस्ते झाले म्हणजे विकास नाही. उद्योगधंदे, पर्यटन विकास या माध्यमातून गुहागर अजूनही मागे आहे. त्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि गुहागर तालुक्याचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक रिंगणात उतरली असून सोमवार दि. २८ रोजी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी शृंगारतळी येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

 

गुहागरमध्ये आजपर्यंत दोन घराण्यांभोवतीच सत्ता राहिली आहे. तेच येथील प्रस्थापीत आहेत. सर्वसामान्यांची कामे होत नाहीत. स्थानिक आमदारांकडे एखाद्या गावातला कार्यकर्ता काम घेऊन गेला तर तुमच्या गावातून मतदान मला किती झाले असा प्रश्न केला जातो. जलजीवनसारख्या पाणीयोजना अजूनही रखडलेल्या आहेत. गुहागर-विजापूर महामार्गाची ५ वर्षात कशी अवस्था झाली आहे. आरोग्य यंत्रणा सुस्थितीत नाही. उच्च शिक्षणासाठी मुलांना बाहेर जावे लागते. उद्योगधंदे नसल्याने येथील तरुण मुंबई, पुणेसारख्या शहरात नोकरी-व्यवसायासाठी जातो. हे वर्षानुवर्षे आमदारकी सांभाळणाऱ्या नेत्यांना दिसून येत नाही. केवळ निवडणुका आल्या की, भूमीपूजने करायची. निवडून आल्यानंतर सुरुवातीपासून ही भूमीपूजने का केली जात नाहीत, असा सवाल प्रमोद गांधी यांनी उपस्थित केला आहे.

माझ्यासमोर तगडा उमेदवार कोणीच नाही असे म्हणणाऱ्या आ. भास्कर जाधव यांचा तो अहंकार आहे. ते पक्ष म्हणून असे बोलत नाही. स्वतःचा मोठेपणा त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होतो. मी म्हणजे विकास हा त्यांचा भ्रम आहे. गुहागर तालुक्यात विकास झालेलाच नाही. त्यामुळे विकास हाच ध्यास घेऊन मनसे निवडणूक रिंगणात उतरली आहे. राजसाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व घेऊनच आम्ही यावेळी गुहागरमध्ये  परिवर्तन घडवून आणणार आहोत. लोकसभा निवडणूक दरम्यान, राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता तो काही मागण्यांसंदर्भात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी या आग्रही मागण्या सादर केल्या होत्या. त्यातील एका मागणीची सोडवणूक झाली असून मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा हे ठाकरे यांचे मोठे यश असल्याचे गांधी यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, चिपळूण तालुकाध्यक्ष विश्वनाथ डोळस, सचिव संदेश साळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित ⭕ अमालिया स्त्री गौरव पुरस्कार व पेडणेकर ग्रूप तर्फे...
Read More
सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

पाटपन्हाळे महाविद्यालयात '६३ मुन्स'च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी AI आणि Machine Learning कोर्सेसची सुवर्णसंधी; 'MKCL'...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन पुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन,...
Read More
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन