पुष्पक एक्स्प्रेस मधुन प्रवाशांच्या उड्या विचित्र जळगाव रेल्वे अपघात.
🟪🟪
आगीची अफवा, ट्रेनमधून प्रवाशांच्या उड्या; वळणानं घात केला; प्रवास अखेरचा ठरला*
जळगाव- ट्रेनच्या डब्याला आग लागल्याची अफवा ११ प्रवाशांसाठी काळ ठरली. मुंबईच्या दिशेनं निघालेल्या पुष्पक एक्स्प्रेसच्या ११ प्रवाशांचा केवळ एका अफवेमुळे बळी गेला. जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून उड्या मारणारे प्रवासी शेजारच्या ट्रॅकवरुन आलेल्या एक्स्प्रेस खाली आले. एक्स्प्रेसनं चिरडल्यानं त्यांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात भीषण रेल्वे अपघात झाला.
घटनास्थळी एक तीव्र वळण असल्यानं पुष्पक एक्स्प्रेसमधून उतरलेल्या प्रवाशांना बंगळुरु एक्स्प्रेस दिसली नाही. त्यामुळेच ही दुर्घटना घडली, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. तीव्र वळणावरुन धावणारी बंगळुरु एक्स्प्रेस भरधाव वेगात अचानक आल्यानं प्रवाशांना बाजूला होण्यास वेळच मिळाला नाही. त्यांना हालचाल करण्याची संधीच तीव्र वळणामुळे मिळाली नाही. प्रवासी अचानक दिसल्यानं एक्स्प्रेसच्या लोको पायलटला भरधाव पळणारी ट्रेन थांबवणं शक्य झालं नाही. मुंबईकडे निघालेल्या पुष्पक एक्स्प्रेसनं ब्रेक लावल्यानं चाकांजवळ आगीच्या ठिणग्या उडाल्या.
डब्याला आग लागल्याचा काही प्रवाशांचा समज झाला. त्यानंतर आग लागल्याची अफवा डब्यात पसरली. घाबरलेल्या प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या टाकल्या. त्याचवेळी शेजारील ट्रॅकवरुन बंगळुरु एक्स्प्रेस भरधाव वेगात आली. ती कर्नाटकाच्या दिशेनं निघाली होती. या एक्स्प्रेसनं पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या टाकलेल्या प्रवाशांना चिरडलं. लखनऊहून मुंबईला जात असलेल्या पुष्पक एक्स्प्रेसच्या चाकांमधून ठिणग्या उडू लागल्या. त्या पाहून प्रवाशांना आग लागल्याचं वाटलं. प्रवासी घाबरले. त्यांनी चेन ओढून ट्रेन थांबवली.
त्यानंतर प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. अनेक प्रवासी शेजारच्याच रुळांवर थांबले. त्यावेळी त्या रुळांवर बंगळुरु एक्स्प्रेस भरधाव वेगात आली. त्या एक्स्प्रेसनं रुळांवरील प्रवाशांना चिरडलं. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला. बंगळुरु एक्स्प्रेसच्या धडकेत ५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. अपघातानंतर पुष्पक एक्स्प्रेसच्या कोच आणि ब्रेकिंग सिस्टिमच्या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींचा शोध सुरु करण्यात आला आहे. रेल्वे प्रवासादरम्यान अफवांकडे दुर्लक्ष करा. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत ट्रेनमध्येच थांबा, असं आवाहन रेल्वे अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.