अभिषेक शर्माने इंग्लंडला हरवलं; इंग्लिश संघाचा टी-२० मधील सर्वात वाईट पराभव; १०० धावांच्या आत ऑल आऊट!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सिर्फ एक बंदा काफी है!एकट्या अभिषेक शर्माने इंग्लंडला हरवलं; इंग्लिश संघाचा टी-२० मधील सर्वात वाईट पराभव; १०० धावांच्या आत ऑल आऊट!

अभिषेक शर्माच्या शतकाच्या जोरावर भारताने पाचव्या टी-२० सामन्यात इंग्लंडवर १५० धावांनी मोठा विजय नोंदवला आहे. अभिषेक शर्माने या सामन्यात १३५ धावांची धुव्वाधार खेळी केली. अभिषेक शर्मा फक्त शतक झळकावून थांबला नाही तर त्याने एकाच षटकात २ विकेट्स घेत विक्रम केला आहे. तर मोहम्मद शमीने ३ विकेट्स घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दणक्यात पुनरागमन केलं आहे.

भारताने दिलेल्या २४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अवघ्या ९७ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून एकट्या अभिषेक शर्माने १३५ धावांची वादळी खेळी केली. इंग्लंडचे ११ खेळाडूही १३५ धावांचा टप्पा गाठू शकला नाही आणि १०० धावांच्या आतच इंग्लिश संघ सर्वबाद झाला. मालिका आधीच काबीज केलेल्या टीम इंडियाने शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा एकतर्फी १५० धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. इंग्लंडचा धावांच्या बाबतीत हा सर्वात वाईट पराभव आहे.

भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला आणि पहिल्याच चेंडूपासून तुफानी फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. संजू सॅमसनने पहिल्याच षटकात १६ धावा केल्या पण पुढच्याच षटकात तो बाद झाला. मात्र अभिषेक शर्माने दुसऱ्या बाजूने आक्रमण सुरूच ठेवत आपली तुफानी फटकेबाजी सुरूच ठेवली.

*अभिषेक शर्माने एकाटच इंग्लंडला पडला भारी*

अभिषेकने विशेषत: जोफ्रा आर्चर आणि जेमी ओव्हरटन यांच्याविरूद्ध जोरदार फटकेबाजी केली आणि पॉवरप्लेमध्ये अवघ्या १७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या फॉरमॅटमध्ये भारताचे हे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. टीम इंडियाने पहिल्या ६ षटकात ९५ धावा केल्या होत्या. अभिषेकची वादळी फलंदाजी सुरूच होती आणि त्याने ११व्या षटकात ३७ चेंडूत शतक पूर्ण केले. रोहित शर्मानंतर अभिषेक शर्माने भारतासाठी दुसरे सर्वात जलद शतक झळकावले.

१८व्या षटकात बाद होण्यापूर्वी अभिषेकने केवळ ५४ चेंडूत १३५ धावा केल्या, ज्यात १३ षटकार आणि ७ चौकारांचा लगावले. त्याच्याशिवाय शिवम दुबे आणि तिलक वर्मा यांनीही लहान पण वेगवान खेळी खेळल्या. इंग्लंडकडून ब्रेडन कार्सने ३ विकेट घेतले.

इंग्लंडने २४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरूवात केली आणि पहिल्याच षटकात फिल सॉल्टने मोहम्मद शमीविरूद्ध २ चौकार आणि १ षटकारासह वादळी सुरूवात केली. पण त्याला दुसऱ्या टोकावरून चांगली साथ मिळाली नाही. तिसऱ्या षटकात बेन डकेटला शमीने पहिल्याच चेंडूवर माघारी धाडले, तर पाचव्या षटकातच कर्णधार जोस बटलरला वरुण चक्रवर्तीने बाद केले. सॉल्ट दुसऱ्या बाजूने फटकेबाजी करत होताच आणि त्याने २१ चेंडूत अर्धशतकही ठोकले पण बाकीचे फलंदाज वरुण आणि रवी बिश्नोईपुढे शरणागती पत्करताना दिसले.

त्यानंतर ८व्या षटकात शिवम दुबेने सॉल्टला (५५) बाद करून इंग्लंडच्या आशा धुळीस मिळवल्या. यानंतर अभिषेकने एकाच षटकात दोन विकेट घेत इंग्लंडच्या पराभवावर शिक्कामोर्तब केला, यानंतर शमीने ११व्या षटकात सलग दोन विकेट घेत इंग्लंडला पराभूत केलं. टीम इंडियाकडून शमीने सर्वाधिक ३ विकेट घेतले, तर दुबे, अभिषेक आणि वरुणने प्रत्येकी २ विकेट घेतले. अशा प्रकारे टीम इंडियाने मालिका ४-१ ने आपल्या नावे केली आहे.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न