प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रूणालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांह अन्य पदे तात्काळ भरण्याची शिवसेना तालुकाध्यक्ष दिपक नागले यांची मागणी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रूणालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांह अन्य पदे तात्काळ भरण्याची शिवसेना तालुकाध्यक्ष दिपक नागले यांची मागणी

 

राजापूर – संदीप शेमणकर 

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर नसताना त्या ठिेकाणी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेले स्थानिक बीएमएस डॉक्टर आणि सहकार्‍यांकडून रूग्णांना चांगली वैद्यकीय सेवा दिली जाते. मात्र, एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध झाल्यानंतर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेल्या स्थानिक बीएमएस डॉक्टरला सेवामुक्त केले जाते. एमबीबीएस डॉक्टर पुढील वैद्यकीय शिक्षण वा ट्रेनिंगसाठी काही कालावधीसाठी गेल्याने रिक्त झालेल्या जागेवर पुन्हा एकदा स्थानिक बीएमएस डॉक्टरची नियुक्ती केली जाते. त्यातून सर्वसामान्यांना मिळणार्‍या वैद्यकीय सेवेचा बोजवारा उडाला असून हे थांबणार कधी ? असा सवाल शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिपक नागले यांनी उपस्थित केला आहे.

पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लोकरे यांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. नागले, नाना कोरगावकर, सुनिल गुरव, सिद्धी शिर्सेकर, हर्षदा खानविलकर, मधु बाणे, सुर्यकांत सुतार आणि पदाधिकार्‍यांनी आज भेट घेतली. या भेटीच्यावेळी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रूणालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांह अन्य पदे तात्काळ भरणा करण्याची कार्यव्हावी आणि रूग्णांना चांगली सेवा मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. तशी माहिती श्री. नागले यांनी दिली.

ग्रामीण भागातील रूग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी या उद्देशाने ग्रामीण भागामध्ये शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी केली आहे. त्याला रूग्णांकडूनही प्रतिसाद मिळत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनेक जागा विविध कारणांमुळे रिक्त राहीलेल्या आहेत. तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रातील एमबीबीएस डॉक्टरांच्या नऊपैकी केवळ तीन जागा भरताना तब्बल सहा आरोग्य केंद्रातील जागा गेल्या कित्येक महिन्यांपासून रिक्त राहीलेल्या आहेत. ज्या ठिकाणी एमबीबीएस डॉक्टर नाहीत त्या ठिकाणी स्थानिक बीएमएस डॉक्टरची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेली आहे. या बीएमएस डॉक्टरांकडून सहकार्‍यांच्या साथीने चांगली वैद्यकीय सेवा दिली जात आहे. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्राला एम बी बी एस डॉक्टर उपलब्ध झाल्यानंतर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेल्या स्थानिक बीएमएस डॉक्टरला सेवेतून मुक्त केले जाते. एमबीबीएस डॉक्टरांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काही महिने सेवा बजावल्यानंतर हे डॉक्टर पुढील वैद्यकीय शिक्षण वा ट्रेनिंगसाठी काही कालावधीसाठी जात असतात. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पुन्हा एकदा स्थानिक बीएमएस डॉक्टरची नियुक्ती केली जाते. या सार्‍या प्रशासकीय खेळखंडोबामध्ये रूग्णांना मिळणार्‍या वैद्यकीय सेवेचा पुरता बोजवारा उडतो. त्याचवेळी सातत्याने सेवामुक्त केले गेल्याने स्थानिक बी एम एस डॉक्टरच्या करिअरही धोक्यात येते. या सार्‍यामध्ये सर्वसामान्य रूग्णांची पुरती हेळसांड होत असून त्याचा विचार करीत या ठिकाणी कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध होण्याबाबत योग्य कार्यवाही व्हावी अशी मागणी श्री. नागले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के