गुहागर मध्ये समुद्रात बुडणाऱ्यांना मिळाले जीवदान..,.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

समुद्रकिनारी विसर्जनासाठी समुद्रात गेलेले पाच तरुण बुडत असताना गुहागर नगरपंचायतीच्या सुरक्षारक्षकांनी वाचवले……

गुहागर : (वार्ताहर )  – येथील समुद्रकिनारी विसर्जनासाठी समुद्रात गेलेले पाच तरुण बुडत असताना गुहागर नगरपंचायतीच्या सुरक्षारक्षकांनी वाचवले. समुद्रात दोरखंड टाकून या सुरक्षारक्षकांनी या पाचजणांना वाचवले. ही घटना गुरुवारी सायंकाळी गौरी-गणपती विसर्जनाप्रसंगी घडली.

गुहागर नगरपंचायतीचे आशिष सांगळे व जगन्नाथ घोरपडे या दोन सुरक्षारक्ष काच्या जागरूकते मुळे पुढील धोका  टळला. सदर ची घटना  गुरुवारी १२ सप्टेंबरला सायंकाळी दुर्गादेवी वाडीतील गौरी-गणपतीची मिरवणूक दुर्गादेवी मंदिरासमोरील पाखाडीने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर आली.  गौरी-गणपतीची समुद्रावर सामूहिक आरती झाली. त्यानंतर एकेकजण गणपतीची मूर्ती घेऊन समुद्रात विसर्जनासाठी जाऊ लागले. गणेश मूर्तींचे विसर्जन करुन समुद्रातून परतत असतानाच पाच तरुण एका लाटेने खोल समुद्रात ओढले गेले. किनाऱ्यावरुन समुद्राचे निरीक्षण करणाऱ्या आशिष सांगळे, जगन्नाथ घोरपडे यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी तातडीने आपल्याकडील दोरखंडाला बोया बांधून तो खोल समुद्रात भिरकावला.

समुद्रात लाटांच्या तडाख्यात अडकलेल्या त्यांना तें दोरी जीवदान देणारीच ठरली, फेकलेल्या दोरीला धरून त्यांनी कसा बसा किनारा गाठला, वेळीच शिताफिने आणि प्रसंगवधान राखून गुहागर नगरपंचायतीचे आशिष सांगळे व जगन्नाथ घोरपडे या दोन सुरक्षारक्ष कानी त्यांचे प्राण वाचवले त्यांचं या धाडसच सर्वत्र कौतकंच केले जातंय.

शुक्रवारी या दोघा सुरक्षा रक्षकांचा  नगरपालिका तर्फे सत्कार करण्यात आला.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]