वाटद मिरवणे ग्रामपंचायत मध्ये झालेल्या स्वच्छ भारत मिशन सौचालय घोटाळा.RTI कार्यकर्ता च्या पाठपुराव्याला यश

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

RTI कार्यकर्ता च्या पाठपुराव्याला यश

वाटद मिरवणे ग्रामपंचायत मध्ये झालेल्या सन २०१४ – १९ मधील स्वच्छ भारत मिशन सौचालय घोटाळा.

रत्नागिरी(निलेश रहाटे) तालुक्यातील वाटद मिरवणे ग्रामपंचायत मध्ये झालेल्या सन २०१४ – १९ मधील स्वच्छ भारत मिशन सौचालय घोटाळा च्या तक्रारीचा पाठपुरावा हा गेली २७ महिने चालू असून त्यामधील तत्कालीन ग्रामसेवक श्री जयकिशन आशिराम आडे सध्या कार्यरत कारंजा पंचायत समिती जिल्हा वाशिम हयांच्या वर ४, ७७, ४०० रुपये स्वतःच्या फायदयासाठी हि रक्कम दूरुपयोग केल्याने वसुली करण्याचे पत्र रत्नागिरी पंचायत समिती कडून तसे प्राप्त झाले होते तक्रारीच्या अनुषंकाने नियमानुसार एक महिन्यानी वसुली व संबंधित दोषी अधिकारी वर कारवाई होणे गरजेच होते पण सरकारी काम तू मार मी रडल्या सारख करतो हयां मुळे हया वसुली साठी व कारवाई साठी कुठे तरी टाळाटाळ करताना अधिकारी व संबंधित कार्यालय काम करताना दिसत होती पण योग्य तो पाठपुरावा व चिकाटी मुळे आज ती रक्कम ग्रामपंचायत वाटद मिरवणे मध्ये १८ हप्ता मध्ये ग्रामनिधी मध्ये जमा होतील व पहिला चेक हा ग्रामपंचायत मध्ये ऑक्टोबर ला जमा झाला आहे.व जो पर्यत दोषी अधिकारी वर योग्य ती कारवाई होत नाही तो पर्यंत पाठपुरावा चालूच राहणार आहे अस श्री निलेश रहाटे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ चे मुख्यप्रचार प्रमुख व पत्रकार हयांनी सांगितले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]