धामनंद रोहिदास वाडी येथील सोनाली कदम जिल्ह्यातील गरिबांना ठरत आहे ,आधारवड व देवदूत

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

धामनंद रोहिदास वाडी येथील सोनाली कदम जिल्ह्यातील गरिबांना ठरत आहे ,आधारवड व देवदूत….

धामनंद रोहिदास वाडी येथील सोनाली कदम जिल्ह्यातील गरिबांना ठरत आहे ,आधारवड व देवदूत

कुटुंबाला मिळवून दिलेल्या पेन्शन योजनेमुळे कुटुंबीयांचे अश्रू अनावर

   ▫️ग्रामस्थांनी मानले आभार

 

खेड:-

खेड तालुक्यातील धामणंद रोहिदास वाडी या वाडीतील सौ.सोनाली संजय कदम ,राहणार -धामणंद रोहिदास वाडी या महिलेने आपल्या वाडीतील तसेच धामणंद गावातील निरक्षर व निराधार असणाऱ्या महिला तसेच अपंग व्यक्ती शासकीय योजनेपासून वंचित आहेत ही गोष्ट त्यांना वारंवार दिसून येत होती. गेली अनेक वर्ष बचत गटामार्फत अनेक महिलांना सोबत घेत त्यांनी महिलांना प्रबोधनाचे काम केलेलं आहे. त्याचबरोबर गावातील महिलांचे प्रतिनिधित्व करीत आहे.

गावातील प्रतिष्ठित व्यक्ती श्री आनंदहीरू कदम यांना सामाजिक क्षेत्राचे आवड असल्यामुळे व त्यांची चिरंजीव श्री संजय आनंदा कदम यांनी ग्रामपंचायती धामण या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेल्या असल्याने खऱ्या अर्थाने सोनाली संजय कदम यांना सामाजिक हितीतून विधायक काम करावं व व समाजातील व गावातील लोकांना अशा योजना मिळवून देऊन त्यांना हातभार करावा असा मानस होता. म्हणूनच हे काम करत असताना त्यांच्या लक्षात आले की, अनेक गावातील कमी शिकलेल्या महिला ज्यांना कोणताही आधार नाही काही अपंग व्यक्ती आहेत त्यांनाही कोणापासून आधार नाही अशा व्यक्तींना काहीतरी आपण करावं असा मानस सोनाली कदम यांचा होता.

सर्व योजनेची योग्य माहिती घेत सर्व निराधार महिला विधवा महिला व अपंग लोकांना एकत्रित करत एक बैठक घरात आयोजित केली. त्यातील आज पर्यंत अनेक महिलांना तसेच अपंग लोकांना त्यांनी पेन्शन मिळून दिली. यामध्ये श्रीम.रंजना रमेश पवार , धामणद, राजवाडा श्रीम.शिल्पा संजय निकम,राजवाडा

श्रीम.रविना रवींद्रगायकवाड,राजवाडा

कु.सचिन दीपक जाधव राहणार जाधववाडी श्री.अनिल अर्जुन जाधव राहणार – जाधववाडी श्री.सुरेश अनंत जाधव राहणार – पायरवाडी

असे शासकीय योजनेचे लाभ दिलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

यामध्ये शासकीय योजनेचा लाभ देत असतानाच राष्ट्रीय कुटुंब लाभाचे सुद्धा याच्यामध्ये लाभ देण्यात आलेले आहे. माननीय तहसीलदार खेळ यांच्या उपस्थितीत सदरचा रक्कम त्यांना अदा करण्यात आलेली आहे.

अशा विधायक आणि लोकांना आधार वाटणाऱ्या आधारवड म्हणून ज्यांची ओळख तयार झालेली आहे ते धामण या गावातील एक महिला सौ सोनाली संजय कदम यांचं कौतुक संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामार्फत करण्यात येत आहे.

त्यांच्याशी बोलण्यात आल्यानंतर लोकांच्या असणाऱ्या अडीअडचणी त्याचबरोबर शासकीय असणारी योजनेची लाभ मिळवून देण्यासाठी मी या गावांमध्ये कायम तत्पर असणार आहे अशा प्रकारचे उद्गार काढले.या उत्तम कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातून खेड तालुक्यातील धामणद रोहिदास वाडी येथील सौ सोनाली संजय कदम यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

Yogesh Pedhambkar
Author: Yogesh Pedhambkar

योगेश पेढांबकर - रत्नागिरी वार्ताहर, चिपळूण-संगमेश्वर, डिजीटल मिडिया प्रतिनिधी

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]