पाकिस्तानची आर्थिक घसरण; भारताशी युद्ध झाल्यास भिकेची वेळ येणार – मूडीजचा इशारा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पाकिस्तानची आर्थिक घसरण; भारताशी युद्ध झाल्यास भिकेची वेळ येणार – मूडीजचा इशारा

भारतासोबत तणाव वाढल्यास पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडेल; परकीय मदतही मिळणार नाही, मूडीज रेटिंग्जचा गंभीर अंदाज

नवी दिल्ली पहलगाम येथील पर्यटकांवरील हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था मूडीजने एक धक्कादायक अहवाल सादर करत पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी गंभीर इशारा दिला आहे.

मूडीजच्या म्हणण्यानुसार, भारताशी युद्धसदृश परिस्थिती उद्भवली तर पाकिस्तानच्या प्रगतीचा वेग थांबेल. आर्थिक सुधारणांमध्ये अडथळे निर्माण होतील आणि आंतरराष्ट्रीय मदतीसाठीही दरवाजे बंद होतील. सध्या पाकिस्तानकडे केवळ 15 अब्ज डॉलर्सचा परकीय चलन साठा आहे, तर भारताकडे 688 अब्ज डॉलर्सहून अधिक राखीव निधी उपलब्ध आहे.

अहवालात म्हटले आहे की, IMFच्या सहाय्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था थोडी स्थिर झाली असली तरी ती अजूनही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली आहे. महागाई कमी झाली असली तरी युद्धजन्य तणावामुळे सर्व सुधारणा पुन्हा मागे जाऊ शकतात.

दुसरीकडे, भारताची आर्थिक स्थिती मजबूत असून, विकास दर चांगला, सरकारी गुंतवणूक वाढती आणि लोकांचा खर्चही सक्रिय आहे. त्यामुळे युद्धाची किंमत पाकिस्तानसाठी अधिकच महागडी ठरू शकते, असा स्पष्ट इशारा मूडीजने दिला आहे.

हॅशटॅग्स:
#PakistanEconomy #IndiaPakistanTension #MoodyReport #EconomicCrisis #BreakingNews #भारतपाकिस्तान #आंतरराष्ट्रीयबातमी #RatnagiriVartaHar

फोट

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]