संगमेश्वर कृषी विभागात पदभरती ठप्प – शेतकऱ्यांचे नुकसान कोण भरून काढणार?

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

संगमेश्वर कृषी विभागात पदभरती ठप्प – शेतकऱ्यांचे नुकसान कोण भरून काढणार?

 

रिक्त पदांमुळे योजनांची अंमलबजावणी ठप्प, शेतकरीवर्ग नाराज; लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

 

देवरूख (संगमेश्वर): संगमेश्वर तालुक्यातील कृषी विभागात अनेक पदे गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असून, त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेत मिळत नाहीये. यामुळे शेतकरीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, स्थानिक लोकप्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका होत आहे.

 

तालुका कृषी अधिकारी पद तब्बल आठ महिन्यांपासून रिक्त आहे. सहाय्यक कृषी अधिकारी, दोन पर्यवेक्षक पदे, चार लिपिक पदांपैकी तीन रिक्त, तसेच ३७ कृषी सहाय्यक पदांपैकी १६ पदे रिक्त आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर पदे न भरल्याने प्रशासनातील उर्वरित कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारीचा ताण आहे.

 

या रिक्त पदांमुळे योजनांची अंमलबजावणी ठप्प झाली आहे. अनेक लाभार्थी योजनांपासून वंचित राहत असून, कार्यालयीन कामकाजाचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. राजकीय नेते पदभरतीसाठी आवाज उठवतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असतानाही प्रत्यक्षात ते दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त होतो आहे.

 

#संगमेश्वर #कृषीविभाग #रिक्तपदे #शेतकरीहित #महाराष्ट्रशासन #देवरूख #TalukaAgricultureOffice #SchemeDelay #PoliticalNeglect

 

फोटो

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]