रत्नागिरीत ट्रिपल मर्डरचा पर्दाफाश! दुर्वास पाटीलसह चौघांना अटक

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🟪🟪
रत्नागिरीत ट्रिपल मर्डरचा पर्दाफाश! दुर्वास पाटीलसह चौघांना अटक

भक्ती मयेकर, सिताराम किर आणि राकेश जंगम खूनप्रकरणी धक्कादायक उघड – पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांची माहिती

रत्नागिरी – तालुक्यातील वाटद-खंडाळा येथे घडलेल्या ट्रिपल मर्डर प्रकरणाचा पोलिसांनी केलेला पर्दाफाश धक्कादायक ठरला आहे. दुर्वास पाटीलने आपल्या मित्रांच्या मदतीने तीन खून थंड डोक्याने केल्याचे उघड झाले आहे. पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या प्रकरणात दुर्वास पाटील, विश्वास पवार, निलेश भिंगार्डे आणि सुशांत नरळकर या चौघांना अटक करण्यात आली असून सध्या ते पोलिस कोठडीत आहेत. यामध्ये –

🔹 भक्ती मयेकर खून (16 ऑगस्ट 2025):
लग्नासाठी सतत दबाव टाकत असल्याने दुर्वासने विश्वास पवार व सुशांत नरळकर यांच्या मदतीने बारमध्ये वायरने गळा आवळून तिचा खून केला. नंतर मृतदेह आंबाघाटात टाकण्यात आला.

🔹 सिताराम लक्ष्मण किर खून (29 एप्रिल 2024):
भक्तीशी अश्लील बोलल्याच्या रागातून दुर्वासने बारमध्येच बेदम मारहाण करून त्याचा खून केला.

🔹 राकेश जंगम खून (6 जून 2024):
सितारामच्या खुनाची माहिती पोलिसांना देण्याची धमकी दिल्यामुळे राकेशचाही खून करून त्याचा मृतदेह आंबाघाटात फेकण्यात आला. मात्र दाट जंगलामुळे आजतागायत मृतदेह सापडलेला नाही.

या तीनही खूनांचा एकमेकांशी संबंध असल्याचे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले. दुर्वास पाटीलच्या या निर्दयी कृत्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

 

 


📌 हॅशटॅग्स

#RatnagiriCrime #TripleMurder #PoliceAction #MaharashtraNews #Ratnagiri


📷 फोटो 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]