वाटद-मिरवणे ग्रामपंचायतीत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

highlits

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वाटद-मिरवणे ग्रामपंचायतीत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

 

 2020-21 मधील लाखो रुपयांच्या अनियमिततेनंतरही कारवाई नाही; ग्रामसेवकाकडून हालचाल नोंद वही दाखविण्यास नकार — तक्रारदाराची शिस्तभंग कारवाईची मागणी

 

रत्नागिरी (प्रतिनिधी): निलेश रहाटे

वाटद-मिरवणे ग्रामपंचायतीतील ग्रामविकास अधिकारी श्री. राजकुमार पिराजी प्रक्षाले यांनी सार्वजनिक अभिलेख असलेली “हालचाल नोंद वही” दाखविण्यास पुन्हा नकार दिल्याची गंभीर तक्रार करण्यात आली आहे. तक्रारदार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ चे रत्नागिरी जिल्हा मुख्य संपर्क प्रमुख व पत्रकार श्री. निलेश रहाटे यांनी ही तक्रार जिल्हा परिषद रत्नागिरी, पंचायत समिती रत्नागिरी तसेच कोकण विभागीय कार्यालय, नवी मुंबई येथे दिनांक 03 ऑक्टोबर 2025 रोजी दाखल केली होती

 

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, दि. 15 ऑक्टोबर 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात भेट दिली असता त्यांनी हालचाल नोंद वही पाहण्याची मागणी केली. मात्र, उपस्थित कर्मचाऱ्यांनी ती उपलब्ध नसल्याचे सांगितले. सरपंचांना विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले की संबंधित वही बाहेर ठेवण्यास ग्रामसेवकास सूचित केले होते. परंतु ग्रामसेवक श्री. प्रक्षाले यांनी फोनवर “मी दुसऱ्या ग्रामपंचायतीत आहे; वही पाहायची असल्यास अर्ज द्या,” असे सांगत नकार दिला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

 

“हालचाल नोंद वही” ही ग्रामपंचायतीतील अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यालयीन उपस्थिती व हालचालींची पारदर्शक नोंद ठेवण्यासाठी असते. ती लपवून ठेवणे म्हणजे सार्वजनिक अभिलेख लपविण्याचा प्रकार असल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे.

 

🔹2020-21मध्ये लाखो रुपयांची अनियमितता व पुन्हा तिथे च नियुक्ती

 

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, सन 2020-21 दरम्यान ग्रामपंचायत वाटद-मिरवणे येथे लाखो रुपयांच्या अनियमिततेबाबत चौकशी अहवाल तयार झाला होता व आणि त्यांच्यावरती प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश 2024 मध्ये देण्यात आले होते मात्र त्यानुसार कोणतीही कारवाई करण्यात आली नाही झालेल्या अनियमित्ता मध्ये कारवाई नाहीच .उलट ऑक्टोबर 2024 मध्ये जिल्हा परिषद मधील ता. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी झालेल्या कामाबाबतची खात्री करून पेमेंट काढण्यासाठी ग्रामपंचायत व इतर विभागाला पत्र दिले होते ह्या आधी गट विकास अधिकारी च्या अहवाल मध्ये अनियमितता झालेली सिद्ध होऊन सुद्धा त्याच्या वर कारवाई करावे असे अहवाल मध्ये नमूद असताना सुद्धा…..

 

अधिक चिंताजनक बाब म्हणजे, अशा गंभीर अनियमिततेत नाव आलेल्या ग्रामसेवकासच सन 2025 मध्ये पुन्हा वाटद-मिरवणे ग्रामपंचायतीचा चार्ज देण्यात आला.

 

तक्रारदाराचा आरोप आहे की, त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुन्हा त्याच लाखो रुपयांच्या प्रलंबित ठेकेदाराना पेमेंट देण्यात आली केलेली काम निष्कृष्ट दर्जा ची असून सुद्धा मासिक सभेच्या मंजुरीद्वारे लाखो रुपये सोडण्यात आले.

हा प्रकार प्रशासकीय हलगर्जीपणा म्हणावा की शासकीय लबाडी, असा प्रश्न तक्रारदार निलेश रहाटे यांनी उपस्थित केला आहे.

Nilesh Rahate
Author: Nilesh Rahate

???? निलेश रहाटे ???? मिडिया प्रतिनिधि - रत्नागिरी वार्ताहर. ता. जिल्हा - रत्नागिरी

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]