करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया महाविद्यालयाने आयोजित ‘कॉस्मॉस जल्लोष’ या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाच्या सांगता समारंभात प्रसिद्ध सिने अभिनेते अशोक कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना करमणूक क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडविण्यासाठी सातत्यपूर्ण मेहनतीचे महत्त्व पटवून दिले. “करमणूक क्षेत्रात आपले नाणे खणखणीत वाजवायचे असेल, तर केवळ प्रतिभा नव्हे, तर अथक परिश्रम आणि चिकाटी आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत पुढे जोडले, “संकटांमध्येही धीर धरा, कारण प्रत्येक अनुभव तुम्हाला मजबूत बनवतो.”

स्वामी समर्थांच्या भूमिकेमुळे सर्वत्र नावलौकिक मिळवलेले अशोक कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून सांगता समारंभाला उपस्थित होते. त्यांनी मनोरंजन क्षेत्रातील विविध अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. ‘गजनी’ चित्रपटात आमिर खान यांच्यासोबत काम करताना आलेले अनुभव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले. उपस्थित विद्यार्थी त्यांच्या कथांमध्ये गुंतून बसले आणि अनेक जणांनी उत्स्फूर्तपणे विचारलेले प्रश्न उत्तरं घेतली.

महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने २७ व २८ जानेवारी या दोन दिवसांत ‘कॉस्मॉस जल्लोष’ अंतर्गत सादरीकरण कला, सर्जनशील कला, साहित्यिक कला, क्रीडा प्रकार तसेच इतर कलात्मक व सर्जनशील क्षेत्रांतील एकूण २१ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात मुंबई परिसरातील ५० हून अधिक महाविद्यालयांमधून २००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थी रंगभूमीवर उत्साहाने सादरीकरण करताना पाहिले गेले.

कॉस्मोपॉलिटन संस्थेचे अध्यक्ष श्री. भारत वालिया तसेच महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. बागेश्री बांदेकर हे मान्यवर सांगता सोहळ्याला उपस्थित होते. महोत्सव यशस्वी व संस्मरणीय ठरावा यासाठी प्रभारी प्राचार्य डॉ. बागेश्री बांदेकर यांच्या नेतृत्वाखाली अध्यापक व विद्यार्थ्यांच्या संघाने मोठ्या समन्वयाने काम केले. विद्यार्थ्यांच्या उत्साहाने आणि कौशल्याने कार्यक्रमात जीवंतपणा आला.

‘कॉस्मॉस जल्लोष’च्या समन्वयक शावी श्रीवास्तव तसेच सर्व अध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा महोत्सव सर्व संबंधितांसाठी अविस्मरणीय ठरला. विद्यार्थ्यांच्या कलात्मक सादरीकरणातून करमणूक क्षेत्रातील नवसर्जनशीलतेला उत्तम मंच उपलब्ध झाला. उपस्थित प्रेक्षकांनी रंगभूमीवरच्या ऊर्जा आणि प्रतिभेचे कौतुक केले, तर विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]