पुण्यात ‘यश प्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा दिमाखात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्यात ‘यश प्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा दिमाखात संपन्न

पुणे (गुरुदत्त वाकदेकर): आत्मसिद्ध मिशन आणि विश्व मराठी परिवार यांच्या वतीने आयोजित ‘यश प्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा पुणे डेक्कन येथील हॉटेल ग्रीन सिग्नल, नीलमल हॉल येथे उत्साही आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. देश-विदेशातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांना प्रेरणेचा सन्मान मानला जाणारा हा पुरस्कार यंदाही विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्यकर्त्यांच्या गौरवाने विशेष ठरला.
या प्रसंगी वनराई संस्था — रवींद्र धारिया यांच्या वतीने संस्थेचे सचिव अमितजी, कविराज विजयराव सातपुते, प्रसिद्ध लेखक, पत्रकार व गीतकार श्रीपाद कुलकर्णी, व्यंगचित्रकार नीरज सबनीस तसेच नवीन आश्वासक नेतृत्व पूजा प्रतुल जागडे या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचा विशेष सत्कार करण्यात आला. सामाजिक, साहित्यिक, पत्रकारिता आणि सर्जनशील क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात करण्यात आला.
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती कटके होते. त्यांच्या मार्गदर्शक आणि विचारप्रवर्तक व्याख्यानाने उपस्थित श्रोते भारावून गेले. प्रमुख पाहुणे म्हणून जयप्रकाश नेऊरगावकर आपल्या सौभाग्यवतींसह उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची प्रतिष्ठा अधिक उंचावली.
कार्यक्रमाचे संयोजन तपेंद्र, गजानन, समता आणि सोनाली यांनी यशस्वीपणे केले. संपूर्ण कार्यक्रमात शिस्तबद्ध मांडणी, प्रसन्न वातावरण आणि आकर्षक सादरीकरण यांची उठावदार छाप दिसून आली. चारुता आपटे यांच्या सुमधुर गायनाने सभागृहात भावस्पर्शी आणि मंत्रमुग्ध करणारा माहोल निर्माण झाला.
आत्मसिद्ध मिशनचे प्रमुख राजेशजी यांच्या प्रभावी संवादातून सकारात्मकता, प्रेरणा आणि आत्मविकासाचा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचला. त्यांच्या करिश्माई संवादाने कार्यक्रमात विशेष चैतन्य निर्माण झाले.
या सोहळ्यास प्रा. संजय पवार, श्रीलिंगम, सुमंगला बाकरे, सनील गाडेकर, माही मस्के, तहेसीन चिंचोलीकर, आकाश मोरे, प्रा. डॉ. प्रियांका जोशी, खाद्य संस्कृती तज्ज्ञ मानसी भोसले, सुयोग कुलकर्णी, प्रा. लहू काळे, निलेशजी, माधुरी ओरसे, कोमल जाधव, नम्रता, पौर्णिमा यादव, सिनेअभिनेत्री नंदिनी, समाजकल्याण अधिकारी शिरसाट साहेब, सातपुते परिवार, राष्ट्रीय पिस्तूल चॅम्पियन प्रथमेश गायकवाड, शृंगेरी शिष्य वेद अभ्यासक श्रीवल्लभजी, दीक्षांतजी यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याची भव्यता आणखी खुलून दिसली.
मराठी गुरु वाय. पी. बाबा यांच्या प्रेरणेतून साकारला जाणारा हा पुरस्कार सोहळा प्रेरणा, सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा उत्सव ठरला. पुणे क्षेत्रासाठी आयोजित हा कार्यक्रम उपस्थितांसाठी ऊर्जा, आनंद आणि प्रेरणेचा अविस्मरणीय अनुभव देणारा ठरला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]