अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर स्वानंदी सरदेसाईचा विवाह; नवरा कोण? उत्सुकतेला मिळाला पूर्णविराम
नाट्यविश्वातून जुळली ओळख; दिग्दर्शक-विक्रमशील कलाकार विक्रांत बदरखे यांच्यासोबत आयुष्याची नवी सुरुवात
रत्नागिरी –
कोकणातील संस्कृतीचे दर्शन घडवत सोशल मीडियावर लोकप्रिय ठरलेली स्वानंदी सरदेसाई हिने अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर विवाहबद्ध होत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. “नवरा कोण?” या प्रश्नाने अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या स्वानंदीच्या लग्नाची उत्सुकता अखेर संपली आहे.
स्वानंदीने विक्रांत रामदास बदरखे यांच्यासोबत विवाह केला असून ते नाट्य दिग्दर्शक, अभिनेते आणि लेखक म्हणून ओळखले जातात. विक्रांत हे मूळचे अकोल्याचे असून एमपीएससीच्या अभ्यासासाठी ते पुण्यात आले होते. अभ्यास सुरू असतानाच त्यांना नाटकाची आवड निर्माण झाली आणि त्यांनी नाट्यक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
नाटकाच्या माध्यमातूनच स्वानंदी आणि विक्रांत यांची ओळख झाली. समान आवड आणि कलाक्षेत्रातील जिव्हाळ्यामुळे दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.
अक्षय तृतीयेच्या शुभदिनी पार पडलेला हा विवाह सोहळा साधेपणातही आकर्षक ठरला असून सोशल मीडियावर या नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.











