मराठ्यांचा इतिहास-01

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मराठ्यांचा इतिहास-01

❝ मुसलमान सत्ताधारी हिंदूंवर सतत अत्याचार करीत होते. त्यात हिंदू समाजाच्या व देशाच्या दीर्घकालीन हानीस कारण झालेला सर्वांत मोठा अत्याचार म्हणजे बळजबरीने अनेक हिंदूंचे केलेले धर्मांतर होय. मुसलमानांनी बाटविलेल्यांना हिंदू धर्मात परत घेण्यास हिंदू समाजाचा फार मोठा विरोध होता. समाजाचा हा विरोध मोडून काढणे मोठमोठ्या प्रतिष्ठित व्यक्तींनाही त्याकाळी शक्य नव्हते. उलट, बाटविलेल्यांना स्वधर्मात घेण्याची गोष्ट राहोच; परंतु त्यांच्याशी व्यवहार करणाऱ्यांनाही स्वधर्मात मुकावे लागे.

अशा त्या कठीण काळात, विशेषतः सर्व देशभर मुसलमानी सत्तेचा फार मोठा प्रभाव असताना, शिवाजी महाराजांनी बजाजी निंबाळकर या प्रतिष्ठित व बलाढ्य सरदारास पुन्हा हिंदू धर्मात आणले. बजाजी निंबाळकर हा विजापूर दरबाराच्या बळजबरीमुळे मुसलमान झाला होता. शिवाजी महाराजांनी त्यास शुद्ध करून हिंदू धर्मात परत घेतले. अफजलखानाने बळाने बजाजीस बाटविले असल्याने त्याचा काही दोष नसल्याचे शिवाजी महाराज व मातोश्री जिजाबाई यांनी समाजास पटवून दिले. त्यामुळे त्याच्या शुद्धीकरणास मान्यता मिळाली. शिखर शिंगणापूरच्या उपाध्यांकडून हे शुद्धीकरण विधीपूर्वक करून घेण्यात आले.

तसेच, शुद्धीकरणानंतर ती व्यक्ती पुन्हा हिंदू समाजात पूर्णपणे एकरूप होण्यासाठी तिला समाजात मानाने स्थान मिळणे आवश्यक आहे, ही महत्त्वाची बाब शिवाजी महाराजांनी लक्षात घेतली. म्हणूनच त्यांनी आपली मुलगी सखुबाई हिचा विवाह बजाजी निंबाळकरांचा मुलगा महादजी याच्याशी लावून दिला. तसेच त्याला पुणे परगण्यातील वाळे येथील पाटीलकीही दिली. अशा प्रकारे महाराजांनी केवळ शुद्धीकरणच केले नाही, तर त्या शुद्धीकरणास समाजात प्रतिष्ठाही मिळवून दिली.

 

दुसरे महत्त्वाचे शुद्धीकरण म्हणजे प्रसिद्ध योद्धा नेताजी पालकर यांचे. नेताजी पालकर मुसलमान बनल्यानंतर जवळजवळ दहा वर्षे औरंगजेबाच्या चाकरीत राहिला. इ.स. १६७६ मध्ये शिवाजी महाराजांवर औरंगजेबाने काढलेल्या मोहिमेत तो दिलेरखानाबरोबर महाराष्ट्रात आला. त्यानंतर तो सरळ रायगडावर जाऊन महाराजांच्या पाया पडला.

शिवाजी महाराजांचे मोठेपण असे की, जवळजवळ आठ-दहा वर्षे इस्लाम धर्मात राहिलेल्या नेताजी पालकरांना त्यांनी शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले. त्यांच्या बायका-मुलांनाही शुद्ध करून घेतले. यानंतर जबरदस्तीने ख्रिस्ती वा मुसलमान झालेल्या अनेक लोकांनी आपल्यालाही शुद्ध करून घ्यावे, अशी मागणी केली.

या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शिवाजी महाराजांनी शुद्धीकरण खाते सुरू केले.

@Facebook viral 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]