सागरी महामार्गावर मासे वाहतूक करणाऱ्या पाणीसांड vehicles वर कारवाई; १० गाड्यांवर उपप्रादेशिक विभागाची धडक

सागरी महामार्गावर मासे वाहतूक करणाऱ्या पाणीसांड vehicles वर कारवाई; १० गाड्यांवर उपप्रादेशिक विभागाची धडक

 

नाटे-जैतापूर मार्गावर रस्त्यावर तेलकट पाणी सोडल्यामुळे वाढलेल्या अपघातांवर स्थानिकांच्या तक्रारीनंतर झालेली तात्काळ कारवाई

 

समिर शिरवडकर – रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील साखरी नाटे ते जैतापूर सागरी महामार्गावर तैलयुक्त मासे वाहतूक करणाऱ्या गाड्यांकडून रस्त्यावर पाणी व ऑईल सोडण्याचे प्रमाण वाढल्याने अपघातांचे प्रमाण गंभीर बनले आहे. सायंकाळी ६ ते पहाटे ६ या वेळेत मोठ्या प्रमाणावर मासे वाहतूक होत असते.

 

या पाण्यामुळे रस्ते ओले व घसरणीचे होऊन दुचाकीस्वार अपघातग्रस्त होत आहेत, अनेकांना कायमचे दुखापत झाली आहे. स्थानिकांनी वेळोवेळी मत्स्यव्यवसाय विभाग, पोलीस ठाणे, ग्रामपंचायत व संबंधित कंपन्यांकडे तक्रारी करूनही दुर्लक्षच झाले.

 

त्यामुळे स्थानिक नागरिकांनी १ मे महाराष्ट्र दिनी उपोषणाचा इशारा देत परिवहन आयुक्त, मुंबई व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय MH08 यांच्याकडे पत्राद्वारे कठोर कारवाईची मागणी केली होती.

 

या पत्रावर उपप्रादेशिक विभागाचे वरिष्ठ अधिकारी अजित ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली साळुंखे अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत १० वाहने पकडून कारवाई केली, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

 

स्थानिकांनी या कारवाईचे स्वागत करत, कारवाई सातत्याने सुरू राहावी आणि नियमबाह्य गाड्यांवर कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.

 

हॅशटॅग्स:

#रत्नागिरी #सागरीमहामार्ग #मासेवाहतूक #जैतापूर #अपघात #पाणीसांडगाड्या #परिवहनविभाग #MH08

 

 

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें