साटवली ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार; सुदवाडी ग्रामस्थांचा संताप उसळला

साटवली ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार; सुदवाडी ग्रामस्थांचा संताप उसळला

 

दहा वर्षांपासून पायवाटेच्या कामाला टाळाटाळ; लेखी पत्रव्यवहार, ग्रामसभा, तरीही दुर्लक्ष कायम

 

बातमी सविस्तर..

लांजा (प्रतिनिधी जितेंद्र चव्हाण) – साटवली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सुदवाडी या वाडीकडे गेली अनेक वर्षे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 2014 साली पायवाट बनवण्याचा प्रस्ताव ग्रामसभेत मंजूर करूनही आजपर्यंत त्यावर कोणतेही काम झालेले नाही, अशी माहिती ग्रामस्थ अनंत सूद यांनी दिली.

 

सुदवाडीतील नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार, तक्रारी आणि मागण्या करूनही प्रशासनाने दुर्लक्षच केल्याचा आरोप केला आहे. विशेषतः सुदवाडीतील अंधारी, खाचखळग्यांनी भरलेली पायवाट वयोवृद्ध, आजारी नागरिकांसाठी मोठा धोका ठरत आहे. रात्रीच्या वेळी विजेअभावी ही पायवाट जीवघेणी बनते. यावर सौरदिवे किंवा वीजपुरवठा करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

 

ग्रामस्थांनी दिनांक 22 मार्च 2025 रोजी पत्राद्वारे मागणी करूनही कोणतेही समाधानकारक उत्तर ग्रामपंचायतीने दिलेले नाही. यामुळे ग्रामसेवक व सरपंच यांना लवकरच घेराव घालण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

 

#हॅशटॅग्स:

#साटवलीग्रामपंचायत #सुदवाडीपायवाट #ग्रामस्थांचाआक्रोश #रस्त्याचीआवश्यकता #लांजाबातम्या #RatnagiriNews #MarathiNews

 

फोटोसाठी

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें